शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शेतकरी धडकले वीज कार्यालयावर

By admin | Updated: August 3, 2016 00:24 IST

निवेदन देऊनही कृषीपंपाचे भारनियमन बंद न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भर पावसातच वीज कार्यालयावर मोर्चा नेला.

भारनियमनाचा विरोध : तीन दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आंदोलनसाकोली : निवेदन देऊनही कृषीपंपाचे भारनियमन बंद न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भर पावसातच वीज कार्यालयावर मोर्चा नेला. वीज कार्यालयाने दिलेले आश्वासन पाळले नाही तर तीन दिवसानंतर कुटुंबासह वीज कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू, असा सज्जड इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र पाण्याअभावी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी बाकी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांजवळ विहीर व बोअरवेलची सोय आहे. तरीही शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. कारण यावर्षी पहिल्यांदाच पावसाळ्यातही कृषीपंपाचे १६ तासींचे भारनियमन सुरु केले आहे. या भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. जीवघेणे भारनियमन बंद करण्यात यावे, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील महिन्यात कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते. १ आॅगस्टपर्यंत भारनियमन बंद करण्यात आले नाही तर २ आॅगस्टला आंदोलन करू असा इशारा दिला होता. याची दखल न घेतल्याने काल शेतकऱ्यांनी वीज कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. दरम्यान आज मंगळवारी भर पावसात भारनियमनाचा विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी साकोलीत धडकले.शेतकऱ्यांचा मोर्चा लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथून निघाला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ‘भारनियमन बंद करा’ अशा घोषणा देत हा मोर्चा वीज कार्यालयावर पोहचला. यावेळी कार्यकारी अभियंता हे स्वत: शेतकऱ्यांजवळ आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत निवेदन स्वीकारले. सदर मागण्यांचे निवेदन हे मुंबईला पाठवू व तीन दिवसात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र तीन दिवसानंतर भारनियमन बंद न झाल्यास कुटुंबासह पुन्हा याच कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, नरेंद्र वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, प्रमोद गजभिये, नरेश नगरीकर व तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)