शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

शेतकरी धडकले वीज कार्यालयावर

By admin | Updated: August 3, 2016 00:24 IST

निवेदन देऊनही कृषीपंपाचे भारनियमन बंद न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भर पावसातच वीज कार्यालयावर मोर्चा नेला.

भारनियमनाचा विरोध : तीन दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आंदोलनसाकोली : निवेदन देऊनही कृषीपंपाचे भारनियमन बंद न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भर पावसातच वीज कार्यालयावर मोर्चा नेला. वीज कार्यालयाने दिलेले आश्वासन पाळले नाही तर तीन दिवसानंतर कुटुंबासह वीज कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू, असा सज्जड इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र पाण्याअभावी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी बाकी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांजवळ विहीर व बोअरवेलची सोय आहे. तरीही शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. कारण यावर्षी पहिल्यांदाच पावसाळ्यातही कृषीपंपाचे १६ तासींचे भारनियमन सुरु केले आहे. या भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. जीवघेणे भारनियमन बंद करण्यात यावे, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील महिन्यात कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते. १ आॅगस्टपर्यंत भारनियमन बंद करण्यात आले नाही तर २ आॅगस्टला आंदोलन करू असा इशारा दिला होता. याची दखल न घेतल्याने काल शेतकऱ्यांनी वीज कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. दरम्यान आज मंगळवारी भर पावसात भारनियमनाचा विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी साकोलीत धडकले.शेतकऱ्यांचा मोर्चा लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथून निघाला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ‘भारनियमन बंद करा’ अशा घोषणा देत हा मोर्चा वीज कार्यालयावर पोहचला. यावेळी कार्यकारी अभियंता हे स्वत: शेतकऱ्यांजवळ आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत निवेदन स्वीकारले. सदर मागण्यांचे निवेदन हे मुंबईला पाठवू व तीन दिवसात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र तीन दिवसानंतर भारनियमन बंद न झाल्यास कुटुंबासह पुन्हा याच कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, नरेंद्र वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, प्रमोद गजभिये, नरेश नगरीकर व तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)