शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

कृषिपंपाच्या जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: December 24, 2014 22:54 IST

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही.

संजय साठवणे - साकोलीनागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. खरीप पिक तर गेलेच मात्र रबीचेही पीक विज पुरवठ्याअभावी जाणार का असा प्रश्न आता साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभरात साकोली तालुक्यातील सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची माहिती राज्य शासनाला आहे. युती सरकारणे शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटीचे पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असली शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या वनवासाचे काय, साकोली तालुक्यात ९६ गावे असून या तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथे पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. साकोली तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. तर ज्या शेतकऱ्यांजवळ वाटरपंपाची सोय आहे ते शेतकरी कसेबसे शेती करून उदरनिर्वाह करतात. ज्यांच्याजवळ सिंचनाची सोय नाही ते निसर्गावरच अवलंबून शेती करतात.यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने खरीप पीक गेली. त्यामुळे आता रब्बी पिकावर शेतकऱ्यांची आशा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात विहीरी व बोरवेल केल्या व विजेसाठी वितरण कार्यालयाच्या चकरा मारतात. पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी पिकासाठी पऱ्हे भरले असून रोवणीसाठी वीज जोडणीसाठी वाट पाहत आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना व पॅकेजच्या रूपाने मदतीची घोषणा करते. मात्र अधिकारी व कर्मचारी या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचू देत नाही, ही विदारक परिस्थिती आत्महत्यासाठी भाग पाडते.