शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कृषिपंपाच्या जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: December 24, 2014 22:54 IST

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही.

संजय साठवणे - साकोलीनागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. खरीप पिक तर गेलेच मात्र रबीचेही पीक विज पुरवठ्याअभावी जाणार का असा प्रश्न आता साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभरात साकोली तालुक्यातील सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची माहिती राज्य शासनाला आहे. युती सरकारणे शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटीचे पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असली शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या वनवासाचे काय, साकोली तालुक्यात ९६ गावे असून या तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथे पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. साकोली तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. तर ज्या शेतकऱ्यांजवळ वाटरपंपाची सोय आहे ते शेतकरी कसेबसे शेती करून उदरनिर्वाह करतात. ज्यांच्याजवळ सिंचनाची सोय नाही ते निसर्गावरच अवलंबून शेती करतात.यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने खरीप पीक गेली. त्यामुळे आता रब्बी पिकावर शेतकऱ्यांची आशा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात विहीरी व बोरवेल केल्या व विजेसाठी वितरण कार्यालयाच्या चकरा मारतात. पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी पिकासाठी पऱ्हे भरले असून रोवणीसाठी वीज जोडणीसाठी वाट पाहत आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना व पॅकेजच्या रूपाने मदतीची घोषणा करते. मात्र अधिकारी व कर्मचारी या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचू देत नाही, ही विदारक परिस्थिती आत्महत्यासाठी भाग पाडते.