शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मजुरी वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: May 22, 2015 01:08 IST

महागाई वाढली असली तरी त्यातुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातच मजुराची मजुरी कडाडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आसगाव (चौ.) : महागाई वाढली असली तरी त्यातुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातच मजुराची मजुरी कडाडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.दरवर्षी बियाणे, खते, किटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाणे व खते घेवून शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे. वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोझा शेतकऱ्यांना सोसावा लागत असताना मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ शेती मोठी आहे. परंतु निर्धारित वेळेतच पिकाची मशागत करावी लागते. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी पीक अत्यल्प येत असते. याकरिता शेतकरी डवरणी, फवारणी करण्याकरिता भाडे तत्वाचा अवलंब करीत आहेत. पुरूष व स्त्री मजुर गावात मिळेनासे झाल्याने त्यांना इतर गावातून आणण्यासाठी वाहनाचा खर्चही शेतकऱ्यास करावा लागतो. या मजुरी वाढीच्या व बियाणे तथा खताच्या दरवाढीनंतरही शेतकऱ्यांचा मालाला शासन तसेच व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)