शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

मजुरी वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: May 22, 2015 01:08 IST

महागाई वाढली असली तरी त्यातुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातच मजुराची मजुरी कडाडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आसगाव (चौ.) : महागाई वाढली असली तरी त्यातुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातच मजुराची मजुरी कडाडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.दरवर्षी बियाणे, खते, किटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाणे व खते घेवून शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे. वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोझा शेतकऱ्यांना सोसावा लागत असताना मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ शेती मोठी आहे. परंतु निर्धारित वेळेतच पिकाची मशागत करावी लागते. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी पीक अत्यल्प येत असते. याकरिता शेतकरी डवरणी, फवारणी करण्याकरिता भाडे तत्वाचा अवलंब करीत आहेत. पुरूष व स्त्री मजुर गावात मिळेनासे झाल्याने त्यांना इतर गावातून आणण्यासाठी वाहनाचा खर्चही शेतकऱ्यास करावा लागतो. या मजुरी वाढीच्या व बियाणे तथा खताच्या दरवाढीनंतरही शेतकऱ्यांचा मालाला शासन तसेच व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)