शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

तूर डाळ खरेदीत शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: March 5, 2017 00:24 IST

राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.

क्विंटलमागे हजार रूपयांचे नुकसान : अत्यल्प दराने खरेदीभंडारा : राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांचे क्विंटलमागे १००० ते १२०० रूपयांचे नुकसान होत आहे.भंडारा जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर शेतजमिन लागवडीखाली असून धानाची सर्वाधिक लागवड करण्यात येते. शेतातील पाळीवर आणि काही ठिकाणी बांध्यात तूर पिकांची लागवड करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ११,००० हेक्टरवर तुर पिकाची लागवड करण्यात आली असून सरासरी शेतकऱ्यांना एकरी ५ ते ६ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. यानुसार भंडारा जिल्ह्यात ६५ ते ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात तुर डाळ खरेदीसाठी अधिकृत केंद्र नसल्यामुळे नागपूर बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. याचाच फायदा घेत शेतकरी ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ विकत आहेत. यात शेतकऱ्यांचे हजारांहून अधिक रूपयांचे नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आठ कोटी रूपयांचे नुकसानभंडारा जिल्ह्यात यावर्षी ११ हजार हेक्टरमध्ये तूर पिकाची लागवड करण्यात आली. या लागवडीमधून तुरीचे सुमारे ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाले. या उत्पादीत पिकाला ३,८०० रूपयांचा दर बाजारात मिळत आहे. यात हमी दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १,००० ते १,२०० रूपये याप्रमाणे नुकसान सहन करावे लागत आहे. याचाच अर्थ ६६ हजार क्विंटल तूर पिकांमागे १,२०० रूपये याप्रमाणे सुमारे आठ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. हा पैसा शेतकऱ्यांच्या तोंडातून पळविला जात असताना एकाही लोकप्रतिनिधीने हा प्रश्न उचललेला नाही.राज्यात हमी भाव खरेदी केंद्र सुरू केल्याचे राज्य सरकार सांगत असेल तर भंडारा जिल्हा राज्यात नाही का? आमच्या जिल्ह्यात तूर, मुग, उडीद, तीळ या कठाण पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनही हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. परिणामी व्यापाऱ्यांना कमी दराने तूर पीक विकावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कि शेतकरीविरोधी हा प्रश्न संत्रस्त करीत आहे.- विलासराव श्रुंगारपवार, माजी राज्यमंत्री, भंडारा.