शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

तूर डाळ खरेदीत शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: March 5, 2017 00:24 IST

राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.

क्विंटलमागे हजार रूपयांचे नुकसान : अत्यल्प दराने खरेदीभंडारा : राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांचे क्विंटलमागे १००० ते १२०० रूपयांचे नुकसान होत आहे.भंडारा जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर शेतजमिन लागवडीखाली असून धानाची सर्वाधिक लागवड करण्यात येते. शेतातील पाळीवर आणि काही ठिकाणी बांध्यात तूर पिकांची लागवड करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ११,००० हेक्टरवर तुर पिकाची लागवड करण्यात आली असून सरासरी शेतकऱ्यांना एकरी ५ ते ६ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. यानुसार भंडारा जिल्ह्यात ६५ ते ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात तुर डाळ खरेदीसाठी अधिकृत केंद्र नसल्यामुळे नागपूर बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. याचाच फायदा घेत शेतकरी ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ विकत आहेत. यात शेतकऱ्यांचे हजारांहून अधिक रूपयांचे नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आठ कोटी रूपयांचे नुकसानभंडारा जिल्ह्यात यावर्षी ११ हजार हेक्टरमध्ये तूर पिकाची लागवड करण्यात आली. या लागवडीमधून तुरीचे सुमारे ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाले. या उत्पादीत पिकाला ३,८०० रूपयांचा दर बाजारात मिळत आहे. यात हमी दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १,००० ते १,२०० रूपये याप्रमाणे नुकसान सहन करावे लागत आहे. याचाच अर्थ ६६ हजार क्विंटल तूर पिकांमागे १,२०० रूपये याप्रमाणे सुमारे आठ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. हा पैसा शेतकऱ्यांच्या तोंडातून पळविला जात असताना एकाही लोकप्रतिनिधीने हा प्रश्न उचललेला नाही.राज्यात हमी भाव खरेदी केंद्र सुरू केल्याचे राज्य सरकार सांगत असेल तर भंडारा जिल्हा राज्यात नाही का? आमच्या जिल्ह्यात तूर, मुग, उडीद, तीळ या कठाण पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनही हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. परिणामी व्यापाऱ्यांना कमी दराने तूर पीक विकावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कि शेतकरीविरोधी हा प्रश्न संत्रस्त करीत आहे.- विलासराव श्रुंगारपवार, माजी राज्यमंत्री, भंडारा.