शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळ खरेदीत शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: March 5, 2017 00:24 IST

राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे.

क्विंटलमागे हजार रूपयांचे नुकसान : अत्यल्प दराने खरेदीभंडारा : राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांचे क्विंटलमागे १००० ते १२०० रूपयांचे नुकसान होत आहे.भंडारा जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर शेतजमिन लागवडीखाली असून धानाची सर्वाधिक लागवड करण्यात येते. शेतातील पाळीवर आणि काही ठिकाणी बांध्यात तूर पिकांची लागवड करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ११,००० हेक्टरवर तुर पिकाची लागवड करण्यात आली असून सरासरी शेतकऱ्यांना एकरी ५ ते ६ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. यानुसार भंडारा जिल्ह्यात ६५ ते ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात तुर डाळ खरेदीसाठी अधिकृत केंद्र नसल्यामुळे नागपूर बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. याचाच फायदा घेत शेतकरी ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ विकत आहेत. यात शेतकऱ्यांचे हजारांहून अधिक रूपयांचे नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आठ कोटी रूपयांचे नुकसानभंडारा जिल्ह्यात यावर्षी ११ हजार हेक्टरमध्ये तूर पिकाची लागवड करण्यात आली. या लागवडीमधून तुरीचे सुमारे ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाले. या उत्पादीत पिकाला ३,८०० रूपयांचा दर बाजारात मिळत आहे. यात हमी दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १,००० ते १,२०० रूपये याप्रमाणे नुकसान सहन करावे लागत आहे. याचाच अर्थ ६६ हजार क्विंटल तूर पिकांमागे १,२०० रूपये याप्रमाणे सुमारे आठ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. हा पैसा शेतकऱ्यांच्या तोंडातून पळविला जात असताना एकाही लोकप्रतिनिधीने हा प्रश्न उचललेला नाही.राज्यात हमी भाव खरेदी केंद्र सुरू केल्याचे राज्य सरकार सांगत असेल तर भंडारा जिल्हा राज्यात नाही का? आमच्या जिल्ह्यात तूर, मुग, उडीद, तीळ या कठाण पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनही हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. परिणामी व्यापाऱ्यांना कमी दराने तूर पीक विकावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कि शेतकरीविरोधी हा प्रश्न संत्रस्त करीत आहे.- विलासराव श्रुंगारपवार, माजी राज्यमंत्री, भंडारा.