शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनो स्वतःचा ब्रँड विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

भंडारा: शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या धोरणाचा स्वीकार करून शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि शेती व्यवसायात आधुनिक ...

भंडारा: शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या धोरणाचा स्वीकार करून शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतमाल विक्रीसाठी आपला स्वतःचा ब्रँड विकसित करावा, असे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.

ते तालुक्यातील परसोडी, बेला शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत या संकल्पनेवर आधारित शेतकरी ते ग्राहक अंतर्गत काही ठिकाणी हवे आणि भाजीपाला विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही. त्यामुळे थेट ग्राहकांपर्यंत आपला शेतमाल पोहोचत असल्याने आता शेतकऱ्यांनी एकत्रित गटशेती करून आपला स्वतःचा शेतमाल विक्रीचा ब्रँड विकसित करावा, असे आवाहन कोटांगले यांनी शेतकऱ्यांना केले. यासोबतच त्यांनी तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका तसेच सेंद्रिय शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच परसोडी येथील जागेश्वर वंजारी यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या पॅक हाऊसची पाहणी केली.

शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आता एकाच प्रणालीद्वारे सिस्टीम उभारले असून आता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जिल्ह्याबाहेर पोहोचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जिल्ह्यातील धान पीक हे प्रमुख पीक असून आज आपल्या जिल्ह्यासह राज्यात धानाला चांगली मागणी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करून शेतकरी कंपन्यांमार्फत मार्केटिंगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.असे केल्यास उत्पादन खर्च ही कमी येत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी तालुक्यातील मका लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक आतून सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भंडारा तालुक्यातील कृषी अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.