शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनो स्वतःचा ब्रँड विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

भंडारा: शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या धोरणाचा स्वीकार करून शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि शेती व्यवसायात आधुनिक ...

भंडारा: शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या धोरणाचा स्वीकार करून शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतमाल विक्रीसाठी आपला स्वतःचा ब्रँड विकसित करावा, असे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.

ते तालुक्यातील परसोडी, बेला शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मामार्फत या संकल्पनेवर आधारित शेतकरी ते ग्राहक अंतर्गत काही ठिकाणी हवे आणि भाजीपाला विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही. त्यामुळे थेट ग्राहकांपर्यंत आपला शेतमाल पोहोचत असल्याने आता शेतकऱ्यांनी एकत्रित गटशेती करून आपला स्वतःचा शेतमाल विक्रीचा ब्रँड विकसित करावा, असे आवाहन कोटांगले यांनी शेतकऱ्यांना केले. यासोबतच त्यांनी तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका तसेच सेंद्रिय शेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच परसोडी येथील जागेश्वर वंजारी यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या पॅक हाऊसची पाहणी केली.

शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आता एकाच प्रणालीद्वारे सिस्टीम उभारले असून आता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जिल्ह्याबाहेर पोहोचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जिल्ह्यातील धान पीक हे प्रमुख पीक असून आज आपल्या जिल्ह्यासह राज्यात धानाला चांगली मागणी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करून शेतकरी कंपन्यांमार्फत मार्केटिंगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.असे केल्यास उत्पादन खर्च ही कमी येत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी तालुक्यातील मका लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन शेतीमध्ये पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक आतून सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भंडारा तालुक्यातील कृषी अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.