शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:30 IST

अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो.

विमा कंपनीने नाकारली आर्थिक मदत : चौकशी अहवाल धुडकावलाचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो. परंतु विमा कंपनी आर्थिक मदत धुडकावून लावत असल्याचा प्रकार रेगेंपार येथे उघडकीस आला आहे. वैनगंगा नदी काठावर असलेल्या रेंगेपार (पांजरा) येथील शेतकरी शंकर नागपुरे यांनी सन २०१६ सत्रात २ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली होती. धानाची कापणी केली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या धानाची नासाडी झाली. या धान पिकाचे विमा कवच शेतकरी नागपुरे यांनी काढले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्यांनी पैसा जमा केला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापण्यात आलेल्या धानाला कोंब फुटल्यामुळे धानाचे पीक हातात आले नाही. यासंदर्भात सिहोरा येथील जिल्हा बँकेला माहिती देण्यात आली. याशिवाय अवकाळी पावसाने नुकसान झाला असल्याचा पंचनामा शेत शिवारात धान पिकांचा पंचनामा तलाठी एम.एस. दुबे, ग्रामसेवक बी. एस. राठोड, कृषी सहायक पी.पी. खंडाईत आणि सरपंच कौशल नागपुरे यांच्या चमुने केला आहे. धान पिकांचा अवकाळी पावसाने नुकसन झाला असल्याचा अहवाल चमूने दिला. जिल्हा बँकेच्या सिहोरा शाखेने हा प्रस्ताव विमा कंपनीला पाठविला असता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी खासदार नाना पटोले यांचे जनता दरबार गाठले. सहा महिन्यानंतर पिक विमा कंपनीने सामुहिक शेतीचे नुकसान अशी अट लागू करीत आर्थिक मदत नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. गावात अन्य शेतकऱ्यांसोबत याही शेतकऱ्याला जोडण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमुने प्रस्तावित अहवाल तयार केला आहे. नुकसान झाला असता महिती दिल्यानंतरही विमा कपंनीचे अधिकारी शेत शिवारात पोहचले नाही. कर्मचाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेत शिवारात उत्पादीत पिकांचा सुरक्षीत कवच व शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासन योजना राबवित आहेत. पंरतु विमा कंपन्या शेतकऱ्यांसमोर अनेक भानगडी निर्माण करीत असल्याने शेतकरी विमा काढताना नाकारत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमूने अहवाल सादर केला असता विमा कंपनीने फेटाळून लावल्यामुळे शंकर नागपुरे हा शेतकरी पीक विमा योजनेच्या आर्थिक मदतीपासून वंचित ठरला आहे. (वार्ताहर)पीक विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विविध कारणांमुळे आर्थिक मदतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.- मंगेश बोरकर, व्यवस्थापक जिल्हा बँक, सिहोरापीक विमा योजनेचा प्रस्ताव चमूने चौकशी करुन तयार केला होता. हा प्रस्ताव धुडकावल्याने अन्याय झाला आहे. न्यायासाठी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावणार आहे.- शंकर नागपुरे, नुकसानग्रस्त शेतकरी रेंगेपार