शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पीक विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:30 IST

अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो.

विमा कंपनीने नाकारली आर्थिक मदत : चौकशी अहवाल धुडकावलाचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो. परंतु विमा कंपनी आर्थिक मदत धुडकावून लावत असल्याचा प्रकार रेगेंपार येथे उघडकीस आला आहे. वैनगंगा नदी काठावर असलेल्या रेंगेपार (पांजरा) येथील शेतकरी शंकर नागपुरे यांनी सन २०१६ सत्रात २ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली होती. धानाची कापणी केली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या धानाची नासाडी झाली. या धान पिकाचे विमा कवच शेतकरी नागपुरे यांनी काढले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्यांनी पैसा जमा केला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापण्यात आलेल्या धानाला कोंब फुटल्यामुळे धानाचे पीक हातात आले नाही. यासंदर्भात सिहोरा येथील जिल्हा बँकेला माहिती देण्यात आली. याशिवाय अवकाळी पावसाने नुकसान झाला असल्याचा पंचनामा शेत शिवारात धान पिकांचा पंचनामा तलाठी एम.एस. दुबे, ग्रामसेवक बी. एस. राठोड, कृषी सहायक पी.पी. खंडाईत आणि सरपंच कौशल नागपुरे यांच्या चमुने केला आहे. धान पिकांचा अवकाळी पावसाने नुकसन झाला असल्याचा अहवाल चमूने दिला. जिल्हा बँकेच्या सिहोरा शाखेने हा प्रस्ताव विमा कंपनीला पाठविला असता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी खासदार नाना पटोले यांचे जनता दरबार गाठले. सहा महिन्यानंतर पिक विमा कंपनीने सामुहिक शेतीचे नुकसान अशी अट लागू करीत आर्थिक मदत नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. गावात अन्य शेतकऱ्यांसोबत याही शेतकऱ्याला जोडण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमुने प्रस्तावित अहवाल तयार केला आहे. नुकसान झाला असता महिती दिल्यानंतरही विमा कपंनीचे अधिकारी शेत शिवारात पोहचले नाही. कर्मचाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेत शिवारात उत्पादीत पिकांचा सुरक्षीत कवच व शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासन योजना राबवित आहेत. पंरतु विमा कंपन्या शेतकऱ्यांसमोर अनेक भानगडी निर्माण करीत असल्याने शेतकरी विमा काढताना नाकारत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमूने अहवाल सादर केला असता विमा कंपनीने फेटाळून लावल्यामुळे शंकर नागपुरे हा शेतकरी पीक विमा योजनेच्या आर्थिक मदतीपासून वंचित ठरला आहे. (वार्ताहर)पीक विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विविध कारणांमुळे आर्थिक मदतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.- मंगेश बोरकर, व्यवस्थापक जिल्हा बँक, सिहोरापीक विमा योजनेचा प्रस्ताव चमूने चौकशी करुन तयार केला होता. हा प्रस्ताव धुडकावल्याने अन्याय झाला आहे. न्यायासाठी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावणार आहे.- शंकर नागपुरे, नुकसानग्रस्त शेतकरी रेंगेपार