शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

पीक विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:30 IST

अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो.

विमा कंपनीने नाकारली आर्थिक मदत : चौकशी अहवाल धुडकावलाचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो. परंतु विमा कंपनी आर्थिक मदत धुडकावून लावत असल्याचा प्रकार रेगेंपार येथे उघडकीस आला आहे. वैनगंगा नदी काठावर असलेल्या रेंगेपार (पांजरा) येथील शेतकरी शंकर नागपुरे यांनी सन २०१६ सत्रात २ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली होती. धानाची कापणी केली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या धानाची नासाडी झाली. या धान पिकाचे विमा कवच शेतकरी नागपुरे यांनी काढले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्यांनी पैसा जमा केला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापण्यात आलेल्या धानाला कोंब फुटल्यामुळे धानाचे पीक हातात आले नाही. यासंदर्भात सिहोरा येथील जिल्हा बँकेला माहिती देण्यात आली. याशिवाय अवकाळी पावसाने नुकसान झाला असल्याचा पंचनामा शेत शिवारात धान पिकांचा पंचनामा तलाठी एम.एस. दुबे, ग्रामसेवक बी. एस. राठोड, कृषी सहायक पी.पी. खंडाईत आणि सरपंच कौशल नागपुरे यांच्या चमुने केला आहे. धान पिकांचा अवकाळी पावसाने नुकसन झाला असल्याचा अहवाल चमूने दिला. जिल्हा बँकेच्या सिहोरा शाखेने हा प्रस्ताव विमा कंपनीला पाठविला असता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी खासदार नाना पटोले यांचे जनता दरबार गाठले. सहा महिन्यानंतर पिक विमा कंपनीने सामुहिक शेतीचे नुकसान अशी अट लागू करीत आर्थिक मदत नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. गावात अन्य शेतकऱ्यांसोबत याही शेतकऱ्याला जोडण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमुने प्रस्तावित अहवाल तयार केला आहे. नुकसान झाला असता महिती दिल्यानंतरही विमा कपंनीचे अधिकारी शेत शिवारात पोहचले नाही. कर्मचाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेत शिवारात उत्पादीत पिकांचा सुरक्षीत कवच व शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासन योजना राबवित आहेत. पंरतु विमा कंपन्या शेतकऱ्यांसमोर अनेक भानगडी निर्माण करीत असल्याने शेतकरी विमा काढताना नाकारत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमूने अहवाल सादर केला असता विमा कंपनीने फेटाळून लावल्यामुळे शंकर नागपुरे हा शेतकरी पीक विमा योजनेच्या आर्थिक मदतीपासून वंचित ठरला आहे. (वार्ताहर)पीक विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विविध कारणांमुळे आर्थिक मदतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.- मंगेश बोरकर, व्यवस्थापक जिल्हा बँक, सिहोरापीक विमा योजनेचा प्रस्ताव चमूने चौकशी करुन तयार केला होता. हा प्रस्ताव धुडकावल्याने अन्याय झाला आहे. न्यायासाठी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावणार आहे.- शंकर नागपुरे, नुकसानग्रस्त शेतकरी रेंगेपार