शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By admin | Updated: October 25, 2015 00:31 IST

तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना...

तहसीलदारांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारालाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करण्याची व इतर सोयी सुविधा देण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकर तात्काळ नुकसानभरपाई द्यावी कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, १० हजार रूपये शेतकऱ्यांना बोनस द्यावा, हमी भावात वाढ करावी, जुनी आणेवारी पद्धत नष्ट करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांचे नेतृत्व सुनील पाटील पटले, श्यामसुंदर देशमुख, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पं.स. सदस्य मोरेश्वरी पटले, सुरेश बोपचे, सुदर्शन वाघमारे, सुरेश बोपचे यांनी केले. याप्र्रसंगी सरपंच उज्ज्वला जनबंधू, नूतन ठाकरे, प्रदीप रहांगडाले, संजय रहांगडाले, संजय बोपचे, धनराज पारधी, पुरण पटले, सुनिल बांते, सरपंच माया अंबुले, धनंजय ठाकरे, कुंडलीक रहांगडाले, शक्तिदास बोपचे, रामनाथ पारधी, गणराज पारधी आदी परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहावी का?तालुक्यातील मांगली रेंगोळा येथील दिलीप चौधरी या धान उत्पादक शेतकऱ्याने सततची नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंब निराधार झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची मागणी लाखनी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. किती आत्महत्याची शासनाने वाट बघावी, असा प्रश्न गिऱ्हेपुंजे यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यात दुष्काळ घोषित करून कर्जमाफ केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुनील गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे.आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका -सेवक वाघायेधान उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले आहे. तुटपुंज्या कर्जाने निराश होऊन आत्महत्या करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नये. शेतकरी हा कुटुंबाचा कर्ता पुरूष आहे. त्याची हिंमत खचली तर कुटुंबापुढे संकट निर्माण होतात. अनेक मोठमोठे उद्योगपती शासनाचे कर्ज बुडवितात त्याचे शासन वाईट करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हारू नये.