शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By admin | Updated: October 25, 2015 00:31 IST

तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना...

तहसीलदारांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारालाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करण्याची व इतर सोयी सुविधा देण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकर तात्काळ नुकसानभरपाई द्यावी कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, १० हजार रूपये शेतकऱ्यांना बोनस द्यावा, हमी भावात वाढ करावी, जुनी आणेवारी पद्धत नष्ट करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांचे नेतृत्व सुनील पाटील पटले, श्यामसुंदर देशमुख, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पं.स. सदस्य मोरेश्वरी पटले, सुरेश बोपचे, सुदर्शन वाघमारे, सुरेश बोपचे यांनी केले. याप्र्रसंगी सरपंच उज्ज्वला जनबंधू, नूतन ठाकरे, प्रदीप रहांगडाले, संजय रहांगडाले, संजय बोपचे, धनराज पारधी, पुरण पटले, सुनिल बांते, सरपंच माया अंबुले, धनंजय ठाकरे, कुंडलीक रहांगडाले, शक्तिदास बोपचे, रामनाथ पारधी, गणराज पारधी आदी परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहावी का?तालुक्यातील मांगली रेंगोळा येथील दिलीप चौधरी या धान उत्पादक शेतकऱ्याने सततची नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंब निराधार झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची मागणी लाखनी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. किती आत्महत्याची शासनाने वाट बघावी, असा प्रश्न गिऱ्हेपुंजे यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यात दुष्काळ घोषित करून कर्जमाफ केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुनील गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे.आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका -सेवक वाघायेधान उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले आहे. तुटपुंज्या कर्जाने निराश होऊन आत्महत्या करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नये. शेतकरी हा कुटुंबाचा कर्ता पुरूष आहे. त्याची हिंमत खचली तर कुटुंबापुढे संकट निर्माण होतात. अनेक मोठमोठे उद्योगपती शासनाचे कर्ज बुडवितात त्याचे शासन वाईट करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हारू नये.