शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By admin | Updated: October 25, 2015 00:31 IST

तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना...

तहसीलदारांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारालाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करण्याची व इतर सोयी सुविधा देण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकर तात्काळ नुकसानभरपाई द्यावी कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, १० हजार रूपये शेतकऱ्यांना बोनस द्यावा, हमी भावात वाढ करावी, जुनी आणेवारी पद्धत नष्ट करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांचे नेतृत्व सुनील पाटील पटले, श्यामसुंदर देशमुख, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पं.स. सदस्य मोरेश्वरी पटले, सुरेश बोपचे, सुदर्शन वाघमारे, सुरेश बोपचे यांनी केले. याप्र्रसंगी सरपंच उज्ज्वला जनबंधू, नूतन ठाकरे, प्रदीप रहांगडाले, संजय रहांगडाले, संजय बोपचे, धनराज पारधी, पुरण पटले, सुनिल बांते, सरपंच माया अंबुले, धनंजय ठाकरे, कुंडलीक रहांगडाले, शक्तिदास बोपचे, रामनाथ पारधी, गणराज पारधी आदी परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहावी का?तालुक्यातील मांगली रेंगोळा येथील दिलीप चौधरी या धान उत्पादक शेतकऱ्याने सततची नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंब निराधार झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची मागणी लाखनी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. किती आत्महत्याची शासनाने वाट बघावी, असा प्रश्न गिऱ्हेपुंजे यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यात दुष्काळ घोषित करून कर्जमाफ केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुनील गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे.आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका -सेवक वाघायेधान उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले आहे. तुटपुंज्या कर्जाने निराश होऊन आत्महत्या करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नये. शेतकरी हा कुटुंबाचा कर्ता पुरूष आहे. त्याची हिंमत खचली तर कुटुंबापुढे संकट निर्माण होतात. अनेक मोठमोठे उद्योगपती शासनाचे कर्ज बुडवितात त्याचे शासन वाईट करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हारू नये.