शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:54 IST

शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संताजी मंगल कार्यालय बेलघाटा वॉर्ड येथे आयोजित सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळा उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.सोहळ्याचे उद्घाटन आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी नगराध्यक्षा पुनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा अर्बन को बँकचे संचालक विलास काटेखाये, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, पंकज रेवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमळे, शोभना गौरशेट्टीवार, निर्मला तलमले, अनुराधा बुराडे, वंदना नंदागवळी, डॉ. राजेश नंदूरकर, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख, देवा महाराज, दुधराम कळंबे, मोहन पंचभाई, अशोक पारधी, प्रशांत पिसे, राजेश राऊत उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले,शेतकरी कर्जमाफी प्रकरणाबाबत शासन गंभीर नसल्याचे आरोप करून नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी वैनगंगा नदीला सोडून स्वच्छ पाण्याला दूषित करण्याचे कृत्य निंदनीय आहे. दूषित पाणी वापरून शेतकरी कष्टाने कमावलेले पैसे वैद्यकीय उपचारावर खर्च करीत आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून शेतकºयांचे पाठीशी उभे राहिले पाहिजे.सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. सर्व जोडप्यांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी शिलाई मशीन, पंकज रेवतकर यांनी बाथरूम संच व राजेश राऊत यांनी ग्रामगिता भेट दिली.शेतकºयांचा वेळ व पैसा बचत करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक मेळाव्यात करावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक संयोजक राजेश तलमले यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी तर, आभार राजेश तलमले यांनी मानले. वºहांड्यासाठी उत्सव समितीच्या वतीने योजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.