शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:54 IST

शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संताजी मंगल कार्यालय बेलघाटा वॉर्ड येथे आयोजित सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळा उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.सोहळ्याचे उद्घाटन आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी नगराध्यक्षा पुनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा अर्बन को बँकचे संचालक विलास काटेखाये, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, पंकज रेवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमळे, शोभना गौरशेट्टीवार, निर्मला तलमले, अनुराधा बुराडे, वंदना नंदागवळी, डॉ. राजेश नंदूरकर, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख, देवा महाराज, दुधराम कळंबे, मोहन पंचभाई, अशोक पारधी, प्रशांत पिसे, राजेश राऊत उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले,शेतकरी कर्जमाफी प्रकरणाबाबत शासन गंभीर नसल्याचे आरोप करून नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी वैनगंगा नदीला सोडून स्वच्छ पाण्याला दूषित करण्याचे कृत्य निंदनीय आहे. दूषित पाणी वापरून शेतकरी कष्टाने कमावलेले पैसे वैद्यकीय उपचारावर खर्च करीत आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून शेतकºयांचे पाठीशी उभे राहिले पाहिजे.सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. सर्व जोडप्यांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी शिलाई मशीन, पंकज रेवतकर यांनी बाथरूम संच व राजेश राऊत यांनी ग्रामगिता भेट दिली.शेतकºयांचा वेळ व पैसा बचत करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक मेळाव्यात करावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक संयोजक राजेश तलमले यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी तर, आभार राजेश तलमले यांनी मानले. वºहांड्यासाठी उत्सव समितीच्या वतीने योजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.