शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे शेतकरी संकटात

By admin | Updated: November 4, 2014 22:36 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे.

पालोरा (चौ): निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे रडावे लागते. दरवर्षी तारेवरची कसरत करू न शेतकरी शेतातून पिक काढण्याच्या प्रयत्न करीत आहे. एकीकडे भारनियमन, जंगली जनावराचा हौदोस, पिकाला लागणारे विविध रोग रात्र दिवस एक करू न शेतकरी पिक काढण्याच्या प्रयत्नात असतो मात्र अखेरच्या क्षणी शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. दुसरीकडे प्रशासकीय सोसायटी, पतसंख्या, बॅक कर्ज भरण्याचा तगाता लावत आहे. आता शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय काहीही पर्याय दिसत नाही हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही.भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिध्द आहे. यात पवनी तालुका हा नंबर एकवर आहे. या तालुक्यात अनेक शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी यावर्षी सुरू वातीला पऱ्हे जगवून रोवणी केली. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती आहे. त्यांचे पुर्वीपासूनच पाण्याअभावी पऱ्हे गेले. दुसऱ्यांदा पऱ्हे टाकण्यात आले. तेही पाण्याविना वारले होते. कसे तरी पऱ्हे जगवून रोवणी केली. थोडाफार पाणी येत असल्यामुळे महागडी रोजी असतांनी सुद्धा शेतकऱ्यांनी आशा न सोडता प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेरच्या पाण्याने जोरदार हजेरी लावली लोकांनी महागडे खत मारले. मात्र शेवटी एका पाण्यासाठी शेकडो हेक्टर शेतातील धान पिक मरळ झाले. पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. धानाचा २००० रू. भाव मिळावा म्हणून अनेक पुढाऱ्यापासून शेतकरी रस्त्यावर आंदोलने केलीत होती. प्रशासनाच्या हुकूमशाही पुढे कुणाचेही काहीही चालले नाही. आता अच्छे दिन येणार म्हणून शेतकऱ्यांपासून तर सामान्य जनता आनंदीत होती. यावर्षी शेतकऱ्यांना वरुणराजाने दगा दिल्याने परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. महागडे खत, औषधी, मजूरी सर्व खर्च जोडता प्रती एकराला १५ ते २० हजार रुपयाचा खर्च आला आहे. उत्पन्न मात्र दोन हजाराचे झाले नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न पडत आहे. प्रशासकीय कर्मचारी पाहणी करीत नाही. आनेवारीची आकडेवारी भरघोस दाखविली जात आहे. परिस्थिती मात्र उलट आहे. आता या भागातीलच मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना बोनस, कर्जमाफी मिळणार म्हणून अशी आशा आहे. संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊ न धान पिकाला २००० रु. भाव द्यावा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, अशी मागणी पवनी तालुक्यातील आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे.आहे.(वार्ताहर)