शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

केंद्रावरील धान उघड्यावर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: December 24, 2015 00:30 IST

चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस बरसला. सद्यस्थितीत ढगाळ वातावरण आहे.

अवकाळी पावसाची भीती : खरेदी धानाला उचल नाही, निसर्गाची अवकृपा सुरुच पालांदूर : चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस बरसला. सद्यस्थितीत ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान्य आधारभूत केंद्रात उघड्यावर आहे. आधीच धान्य पिकले नाही. त्याचत पाऊस आला आणि धान्य भिजले तर कसे होईल, या विवंचनेत शेतकरी आहे. लाखनी तालुक्यात पालांदूर परिसरात जाड धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अपुऱ्या सिंचन सुविधेमुळे १०१०, आरआय ६४, दप्तरी १२५ सारखी जाड वाणांची धान खरेदी केंद्रावर आवक वाढली आहे. अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे.पालांदूर येथे सेवा सहकारी संस्थेअंतर्गत १९ नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरु करण्यात आली असून संस्थेच्या अखत्यारीतील दोन्ही कोठार भरलेले आहेत. यासाठी पालांदुरात दोन गोदाम भाडे तत्वावर घेण्यात आले असून त्याठिकाणी खरेदी सुरु आहे. आतापर्यंत ७,७१६ क्विंटल धानाची खरेदी झाली असून जिल्हा सहकारी बँकेतर्फे हुंडी वटविण्यात आली आहे. याचे चुकारेसुद्धा देण्यात आले आहेत. खरेदीतून ४० टक्के रक्कम पिककर्जाचे कापून उर्वरीत त्याच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. यामुळे पिककर्ज वसुलीला सहकार्य मिळत असले तरी याविषयी शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पुढील वर्षापासून धान खरेदी गोदामअभावी कागदावरच राहणार असे चित्र आहे.पालांदूर येथे धान खरेदी केंद्रासभोवती हजारो पोती उघड्यावर पडून आहेत. धानाचे नुकसान झाल्यास जबाबदार शेतकऱ्यांचीच राहनार असल्यामुळे धानाची मोजणी होईपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवात जीव नाही. रात्रीही शेतकऱ्यांच्या डोळ्याला झोप नाही. त्यांचे लक्ष आभाळाकडे न्याहाळत पाणी थेंबला की छातीत धक धक वाढते. शेवटे मिळेल ते आच्छान पोयावर आच्छादल्या जाते. रोजच मोजणीकरिता विचारणा करून आज उद्याच्या शब्दावर धान खरेदी सुरु आहे. (वार्ताहर)धान खरेदीची अद्ययावत माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना कळविली जाते. खरेदी केलेल्या धान्याकरिता मागणी केली आहे. धान खरेदी सुरु असून गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे. संस्थेच्या गोदामातील पडवीत धान पावसामुळे भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डी.ओ. मिळणे असल्याचे आहे.- सुनील कापसे, गटसचिव, सेवा सहकारी संस्था, पालांदूर.चालू पिक कर्जाचे मुदत ३१ मार्चपर्यंत असते. त्यामुळे धानाच्या रकमेतून ४० टक्के रक्कम कापणे अयोग्य आहे. ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकाच्या उत्पादनातून पिक कर्जाची सोय शेतकरी करतो. थकीत शेतकऱ्यांची पिककर्ज कापण्यास हरकत नाही. १०० दिवसापूर्वीच कर्ज वसुली कापू नये. - वसंत बारई, शेतकरी, पालांदूर (चौ.)