शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

पाण्यासाठी शेतकऱ्याचा हल्लाबोल

By admin | Updated: October 10, 2015 00:55 IST

भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी परिसरात धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.

खरबी पेंच कार्यालयातील प्रकारपुंडलिक हिवसे खरबी भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी परिसरात धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या परिसरातील सुमारे ५०० शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या खरबी कार्यालयावर हल्लाबोल करुन पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, एका शेतकऱ्याने घरुनच गळफास घेऊन या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील महिनाभरापासून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या कार्यालयाला निवेदन दिले. मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ असे पाणी वितरणाचे नियम असूनही ‘हेड टू टेल’ याप्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. खरबी परिसरामध्ये येणाऱ्या खराडी, राजेदहेगाव, परसोडी, नांदोरा, ठाणा परिसरामधील धान पीक पाण्याअभावी करपू लागले आहेत. मागील वर्षी राजदहेगाव, खराडी, नांदोरा येथील धानपिक पाण्याअभावी करपले होते. त्यामुळे राजेदहेगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी बाध्य केले होते. यावर्षीही असाच प्रकार असतानाही पेंच प्रकल्पाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज ५०० शेतकऱ्यांनी या कार्यालयावर मोर्चा नेला. एका शेतकऱ्याने गळफास लावण्याच्या प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे तो टळला. सायंकाळपर्यंत पाणी नांदोरा, राजेदहेगाव टेलवर न पोहचल्यास आत्मदहन करण्याच्या इशाराही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग सहायक अभियंता डी. एच. गायधने यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पेंच प्रकल्पाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल. सरकार शेतकऱ्यांचे असुनसुध्दा शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, याची खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी व्यक्त केली.धानाला परिसरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी रात्री ११.३० वाजता गेले असता त्यांना काही शेतकऱ्यानी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ते परत आले. असे असले तरी या शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.- डी.एच. गायधने, सहायक अभियंतापेंच पाटबंधारे विभाग शाखा खरबी.यावर्षी अत्यल्प पावसामुळे धानपीक संकटामध्ये आहे. यासाठी मी या वारंवार कार्यालयाला भेटी देऊनसुध्दा शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे अधिकारी असमर्थ ठरले आहे. दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल.- चंद्रप्रकाश दु्ररुगकर, जि.प. सदस्य ठाणा