शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:55 IST

काही दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे खरीप पिकाच्या आशेने जगत असलेला शेतकरी या वातावरणामुळे पूर्णतः हतबल आणि ...

काही दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे खरीप पिकाच्या आशेने जगत असलेला शेतकरी या वातावरणामुळे पूर्णतः हतबल आणि चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतो. या ढगाळ वातावरणामुळे तूर, मूग, गहू, लाखोरी यासोबतच भाजीपालावर्गीय पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांवर आलेली आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र या खरीप पिकांवर अवलंबून असते; परंतु या ढगाळ वातावरणामुळे या पिकांची खात्री शेतकऱ्याला अजिबात नाही, त्यामुळे आधीच कोरोना महामारीने हातातील काम गेलेला, मग धानाची शेती न पिकल्यामुळे वैतागलेला आणि आता खरीप पिकातून कुठलेही उत्पन्न होणार नाही, असे वातावरण असल्यामुळे शेतकरी पूर्णतः खचलेला पाहायला मिळत आहे.

यंदा तुरीच्या उत्पन्नात घट

पहेला परिसरामध्ये दररोज ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांचे तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या तूर हे फुलोऱ्यावर आलेले आहे व फुलांचे शेंगांत रूपांतर होण्यासाठी थंडीची खूप आवश्यकता असते. ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे तुरीचे उत्पादन नक्कीच घटेल असा काही शेतीतज्ंज्ञाचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढलेली आहे .