शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:55 IST

काही दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे खरीप पिकाच्या आशेने जगत असलेला शेतकरी या वातावरणामुळे पूर्णतः हतबल आणि ...

काही दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे खरीप पिकाच्या आशेने जगत असलेला शेतकरी या वातावरणामुळे पूर्णतः हतबल आणि चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतो. या ढगाळ वातावरणामुळे तूर, मूग, गहू, लाखोरी यासोबतच भाजीपालावर्गीय पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांवर आलेली आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र या खरीप पिकांवर अवलंबून असते; परंतु या ढगाळ वातावरणामुळे या पिकांची खात्री शेतकऱ्याला अजिबात नाही, त्यामुळे आधीच कोरोना महामारीने हातातील काम गेलेला, मग धानाची शेती न पिकल्यामुळे वैतागलेला आणि आता खरीप पिकातून कुठलेही उत्पन्न होणार नाही, असे वातावरण असल्यामुळे शेतकरी पूर्णतः खचलेला पाहायला मिळत आहे.

यंदा तुरीच्या उत्पन्नात घट

पहेला परिसरामध्ये दररोज ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांचे तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या तूर हे फुलोऱ्यावर आलेले आहे व फुलांचे शेंगांत रूपांतर होण्यासाठी थंडीची खूप आवश्यकता असते. ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे तुरीचे उत्पादन नक्कीच घटेल असा काही शेतीतज्ंज्ञाचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढलेली आहे .