शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: September 13, 2015 00:33 IST

तालुक्यात ऊन्ह वाढत असल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परतीचा पाऊस येईल की नाही याची शेतकरी वाट पाहत आहे.

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव : औषधी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची लूटसाकोली : तालुक्यात ऊन्ह वाढत असल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परतीचा पाऊस येईल की नाही याची शेतकरी वाट पाहत आहे. पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याची चाहुल लागत असतानाच वाढत्या उन्हामुळे शेतातील धानपीक माना खाली टाकत असल्याचे चित्र असून जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकरी पिकावर फवारणी करीत आहे. मात्र कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित असल्यामुळे किटकनाशक विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकासंदर्भात योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येक तालुक्यात कृषी कार्यालय आहे. या अंतर्गत कृषी सहाय्यक कृषीमित्र अनेक पदे निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना विविध पिकासंदर्भात खत किटकनाशके, पिकावर होणारे विविध आजाराबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी कृषी केंद्र मालकच शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून औषधाची विक्री करीत आहेत. येथील शेतकरी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून वंचित असल्याचे दरवर्षी धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पिकावरील रोगाचा नायनाट व्हावा यासाठी शेतकरी औषधी दुकानात धाव घेऊन औषधी खरेदी करतो. यावेळी दुकानदार अमुक शेतकऱ्याने ते औषध फवारले त्याच्या पिकाला फायदा झाला असा दाखला देऊन औषधी व किटकनाशके देतो. उधारीमुळे बरेच शेतकरी बिल मागण्याच्या भानगडीत पडत नाही बरेचदा हे महागडे औषध फवारल्यानंतर त्याचा फायदा होत नाही. त्यानंतर शेतकरी दुसऱ्या विक्रेत्याकडे जातो तोसुद्धा याचप्रमाणे मार्गदर्शन करीत त्याला औषधी देत असतो. हा प्रकार सतत सुरु असतो. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक भुर्दंड बसतो. हा प्रकार बंद होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे.कृषि तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बैठका घेवून मार्गदर्शन करावे. या बैठका गावात न घेत शेतशिवारात जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना गोळा करून त्यांना पिकावरील विविध रोगाची माहिती प्रभावी किटकनाशके वापरण्याची पद्धतीची माहिती द्यावी. याकरीता कृषी मित्राचे सहकार्य घ्यावे. रोगावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने प्रभावी औषधी माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)