शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: September 13, 2015 00:33 IST

तालुक्यात ऊन्ह वाढत असल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परतीचा पाऊस येईल की नाही याची शेतकरी वाट पाहत आहे.

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव : औषधी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची लूटसाकोली : तालुक्यात ऊन्ह वाढत असल्याने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परतीचा पाऊस येईल की नाही याची शेतकरी वाट पाहत आहे. पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याची चाहुल लागत असतानाच वाढत्या उन्हामुळे शेतातील धानपीक माना खाली टाकत असल्याचे चित्र असून जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकरी पिकावर फवारणी करीत आहे. मात्र कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित असल्यामुळे किटकनाशक विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकासंदर्भात योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रत्येक तालुक्यात कृषी कार्यालय आहे. या अंतर्गत कृषी सहाय्यक कृषीमित्र अनेक पदे निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना विविध पिकासंदर्भात खत किटकनाशके, पिकावर होणारे विविध आजाराबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी कृषी केंद्र मालकच शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून औषधाची विक्री करीत आहेत. येथील शेतकरी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनापासून वंचित असल्याचे दरवर्षी धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पिकावरील रोगाचा नायनाट व्हावा यासाठी शेतकरी औषधी दुकानात धाव घेऊन औषधी खरेदी करतो. यावेळी दुकानदार अमुक शेतकऱ्याने ते औषध फवारले त्याच्या पिकाला फायदा झाला असा दाखला देऊन औषधी व किटकनाशके देतो. उधारीमुळे बरेच शेतकरी बिल मागण्याच्या भानगडीत पडत नाही बरेचदा हे महागडे औषध फवारल्यानंतर त्याचा फायदा होत नाही. त्यानंतर शेतकरी दुसऱ्या विक्रेत्याकडे जातो तोसुद्धा याचप्रमाणे मार्गदर्शन करीत त्याला औषधी देत असतो. हा प्रकार सतत सुरु असतो. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक भुर्दंड बसतो. हा प्रकार बंद होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने ठोस पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे.कृषि तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बैठका घेवून मार्गदर्शन करावे. या बैठका गावात न घेत शेतशिवारात जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना गोळा करून त्यांना पिकावरील विविध रोगाची माहिती प्रभावी किटकनाशके वापरण्याची पद्धतीची माहिती द्यावी. याकरीता कृषी मित्राचे सहकार्य घ्यावे. रोगावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने प्रभावी औषधी माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)