शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

उसर्रा येथील शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 2, 2015 00:47 IST

दि. १० जूनला रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना लघुशंकेला गेलेल्या शेतमजूरावर रानडुकराने हल्ला केला.

उसर्रा : दि. १० जूनला रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना लघुशंकेला गेलेल्या शेतमजूरावर रानडुकराने हल्ला केला. पण वनविभागाकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नसून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.अशोक संपत चौधरी (४५) असे रानडुकराने हल्ला केलेल्या जखमीचे नाव आहे. उसर्रा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे काम सुरु होते. दिनांक १० जूनला मध्यान्तर सुटीनंतर सदर मजूर लघुशंकेसाठी झुडुपाखाली गेले असता झुडुपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने हल्ला केला. त्यात अशोक चौधरी यांच्या डाव्या पायाला व कंबरेला जबर जखम झाली. त्यानंतर त्यांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुमसर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील कारवाई साठी वनविभाग कांद्री तसेच आंधळगाव हद्दीतील घटना असल्याने आंधळगाव पोलिसात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले असल्याचे जखमी इसमास सांगितले. पण २० दिवसांचा काळ होऊनही वनविभाग कांद्रीच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा साधा पंचनामा घेण्यात आला नसल्याने जखमी इसमाने कमालीचा संताप व्यक्त केला आहे.सदर जखमी इसमाच्या कुटुंबात कमावणारा एकच असल्याने त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार? वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी अशोक चौधरी यांनी केली आहे. (वार्ताहर)