शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

नजर पैसेवारीबाबत शेतकरीच अनभिज्ञ

By admin | Updated: November 5, 2015 00:42 IST

जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशाच्या आत दाखविण्यात आले नाही.

शेतकरी हवालदिल : सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा भंडारा : जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशाच्या आत दाखविण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात निराशा आहे. आता शेतकऱ्यांची नजर १५ नोव्हेंबरला घोषित होणाऱ्या सुधारीत पैसेवारीकडे आहे. गावाची पैसेवारी काढण्यासाठी प्रत्येक गावात एक समिती तयार केली जाते. असे असताना नजरअंदाज पैसेवारी काढताना ही समिती कुठे होती, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थती असतानाही जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७३ पैसे दाखविण्यात आली. त्यावेळी याप्रकारची समिती गावात आली होती का, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत, सुधारीत पैसेवारीची पाहणी खुद्द जिल्हाधिकारी धीरजकुमार हे बांधावर जावून करीत आहेत. त्यामुळे सुधारीत पैसेवारीत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा आहे.जिल्ह्यात १ लाख ११ हजार ९६८ हेक्टर शेतजमीनीवर खरीप पिकाची लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ५७ टक्के एवढी आहे. धानपिकाची ५२.५९ टक्के म्हणजेच ९३ हजार ५७५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. विविध कारणांमुळे अनेक हेक्टर जमीन पडीत राहिली. ऊस पीक चार हजार ४४ हेक्टर क्षेत्रात पेरले गेले. दोन लाख २ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमीच आहे.जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी उच्चप्रतीच्या धानाचे पिक लावतात. तर काही शेतकरी हलक्या धानाचे धानपिक घेत आहेत. परंतु धानपिकावर तुडतुडा, गादमाशी अशा व विविध प्रकारचा रोगराईचा प्रसार झाला आहे. शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा किटकनाशकांची फवारणी केली आहे. एका एकरसाठी एकवेळ औषधी फवारणी करण्याचा खर्च चार ते पाच हजार रुपयाचा येत असतो. रोवणी पासून मळणीपर्यंत येणारा खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातात काहीच येण्याची चिन्हे दिसत नाही. यावर्षी शेतकऱ्यांवर निसर्ग चांगलाच कोपला आहे. आता हलके धान कापणीला आले आहेत. परंतु धानाच्या लोंब्या काही प्रमाणात पांढऱ्या दिसत आहेत. त्यामुळे हलके धानपिकाचेही उत्पादन मोठी घट निर्माण होणार आहे. तसेच उच्चप्रतीचे धानपिक आता लोंब्यांवर आहे. परंतु रोगराईच्या प्रादुर्भावामुळे धानपिक जर्जर झाले आहेत. विविध प्रकारची औषधीची फवारणी करूनही धानावरील प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्याच्या हातात धानपिक येणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४६ गावांची नजरअंदाज पैसेवारी घोषित केली. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना या पैसेवारीत ५० पैशापेक्षा कमीमध्ये एकाही गावाचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाविरुध्द तीव्र नाराजी आहे. सध्यस्थितीत जिल्हा प्रशासनाची सुधारीत पैसेवारीची मोहिम जोमात सुरु आहे. स्वत: जिल्हाधिकारी चमुसह शेतात जावून पाहणी करीत आहेत. पिकाची वास्तविकता जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सुधारीत पैसेवारीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी शक्यता अनेकांनी वर्तविली आहे. (नगर प्रतिनिधी)