शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

नजर पैसेवारीबाबत शेतकरीच अनभिज्ञ

By admin | Updated: November 5, 2015 00:42 IST

जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशाच्या आत दाखविण्यात आले नाही.

शेतकरी हवालदिल : सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा भंडारा : जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशाच्या आत दाखविण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात निराशा आहे. आता शेतकऱ्यांची नजर १५ नोव्हेंबरला घोषित होणाऱ्या सुधारीत पैसेवारीकडे आहे. गावाची पैसेवारी काढण्यासाठी प्रत्येक गावात एक समिती तयार केली जाते. असे असताना नजरअंदाज पैसेवारी काढताना ही समिती कुठे होती, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थती असतानाही जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७३ पैसे दाखविण्यात आली. त्यावेळी याप्रकारची समिती गावात आली होती का, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत, सुधारीत पैसेवारीची पाहणी खुद्द जिल्हाधिकारी धीरजकुमार हे बांधावर जावून करीत आहेत. त्यामुळे सुधारीत पैसेवारीत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा आहे.जिल्ह्यात १ लाख ११ हजार ९६८ हेक्टर शेतजमीनीवर खरीप पिकाची लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ५७ टक्के एवढी आहे. धानपिकाची ५२.५९ टक्के म्हणजेच ९३ हजार ५७५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. विविध कारणांमुळे अनेक हेक्टर जमीन पडीत राहिली. ऊस पीक चार हजार ४४ हेक्टर क्षेत्रात पेरले गेले. दोन लाख २ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमीच आहे.जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी उच्चप्रतीच्या धानाचे पिक लावतात. तर काही शेतकरी हलक्या धानाचे धानपिक घेत आहेत. परंतु धानपिकावर तुडतुडा, गादमाशी अशा व विविध प्रकारचा रोगराईचा प्रसार झाला आहे. शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा किटकनाशकांची फवारणी केली आहे. एका एकरसाठी एकवेळ औषधी फवारणी करण्याचा खर्च चार ते पाच हजार रुपयाचा येत असतो. रोवणी पासून मळणीपर्यंत येणारा खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातात काहीच येण्याची चिन्हे दिसत नाही. यावर्षी शेतकऱ्यांवर निसर्ग चांगलाच कोपला आहे. आता हलके धान कापणीला आले आहेत. परंतु धानाच्या लोंब्या काही प्रमाणात पांढऱ्या दिसत आहेत. त्यामुळे हलके धानपिकाचेही उत्पादन मोठी घट निर्माण होणार आहे. तसेच उच्चप्रतीचे धानपिक आता लोंब्यांवर आहे. परंतु रोगराईच्या प्रादुर्भावामुळे धानपिक जर्जर झाले आहेत. विविध प्रकारची औषधीची फवारणी करूनही धानावरील प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्याच्या हातात धानपिक येणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील ८४६ गावांची नजरअंदाज पैसेवारी घोषित केली. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना या पैसेवारीत ५० पैशापेक्षा कमीमध्ये एकाही गावाचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाविरुध्द तीव्र नाराजी आहे. सध्यस्थितीत जिल्हा प्रशासनाची सुधारीत पैसेवारीची मोहिम जोमात सुरु आहे. स्वत: जिल्हाधिकारी चमुसह शेतात जावून पाहणी करीत आहेत. पिकाची वास्तविकता जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे सुधारीत पैसेवारीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी शक्यता अनेकांनी वर्तविली आहे. (नगर प्रतिनिधी)