शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

पीक नष्ट होण्याच्या भीतीने भरवस्तीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने ...

लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील तावशी येथे भरवस्तीत रविवारी (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशोक सीताराम वालदे (६२, रा. तावशी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अशोक वालदे यांची गावात एक एकर व अन्य मिळून एकूण दोन एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरिपात या शेतजमिनीत विविध पीक लागवडीकरिता वालदे यांनी पीक कर्जाची उचल केली होती. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत नसल्याने पावसाअभावी रोवणी वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, वालदे यांनी तणावात येत भरवस्तीत स्वमालकीच्या घरासमोर जांभळीच्या झाडाला गळफास लावून घेतला. शेतकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मृत्यू झाला. घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी केली आहे. तपास दिघोरी मोठीचे ठाणेदार नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात अनिल नंदेश्वर करीत आहेत.

160821\img-20210815-wa0041.jpg

मृतक अशोक सिताराम वालदे रा तावशी