शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पीक नष्ट होण्याच्या भीतीने भरवस्तीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने ...

लाखांदूर (भंडारा) : काही दिवसांपासून पाऊस येत नसल्याने पाण्याअभावी शेती नष्ट होण्याच्या भीतीने तणावात असलेल्या एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील तावशी येथे भरवस्तीत रविवारी (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशोक सीताराम वालदे (६२, रा. तावशी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अशोक वालदे यांची गावात एक एकर व अन्य मिळून एकूण दोन एकर शेतजमीन आहे. यंदाच्या खरिपात या शेतजमिनीत विविध पीक लागवडीकरिता वालदे यांनी पीक कर्जाची उचल केली होती. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत नसल्याने पावसाअभावी रोवणी वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, वालदे यांनी तणावात येत भरवस्तीत स्वमालकीच्या घरासमोर जांभळीच्या झाडाला गळफास लावून घेतला. शेतकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मृत्यू झाला. घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी केली आहे. तपास दिघोरी मोठीचे ठाणेदार नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात अनिल नंदेश्वर करीत आहेत.

160821\img-20210815-wa0041.jpg

मृतक अशोक सिताराम वालदे रा तावशी