शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अतिक्रमणाचे विळख्यात तलाव

By admin | Updated: March 28, 2017 00:19 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे.

नियोजनाचा अभाव : मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम, लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?अशोक पारधी पवनी भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद मालकीचे तलाव आहे. त्यासर्व तलावावर सभोवताल लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. भोईतलाव, बालसमुद्र व कुऱ्हाडा असे तीन महत्वाचे तलाव पालिका क्षेत्रात आहेत. तीनही तलाव अतिक्रमणाचे विळख्यात जखडलेले आहेत.भाईतलाव वॉर्डात असलेले भाईतलाव हे तलाव जिल्हा परीषदच्या मालकीचे आहे. लक्षावधी रूपये खर्च करून शासनाने रोजगार निर्मिती करून तलावाचे खोलीकरण केले. मत्स्य उत्पादनासाठी तलाव वापरात आहे. गेल्या १० वर्षापूर्वी तलाव सर्व बाजूने दिसत होते. आता मात्र पाळीवर चढल्यानंतर सभोवताल अतिक्रमण झालेले तलाव पाहता येते. सर्व बाजूला अतिक्रमण असल्याने तलावात पाणीसाठा वाढवू शकत नाही त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. प्रसिद्ध असलेल्या परकोटाचे पायथ्याशी बालसमुद्र नावाचे तलाव आहे. एका बाजूला पुरातन असलेली मातीची भिंत (टेकडी) म्हणजेच तलावाची पाळ आहे. दुसऱ्या बाजुला जगन्नाथ मंदीर, चंद्रमनी विहार व पर्यटन संकूल आहे. उर्वरित दोन बाजूवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.पवनी-निलज रस्त्याचे बाजुला प्रसिद्ध असलेले कुऱ्हाडा तलाव. तलावाचे पाळीवर लोकांनी राहत्या घरासाठी व लहान लहान उद्योगासाठी अतिक्रमण केलेले आहे. तलावाची दुसरी बाजू म्हणजे बस्तरवारी व बेलघाटा वॉर्ड. या भागात लोकांनी रहाण्यासाठी घर बांधताना तलावाचे मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. या तलावाचे खोलीकरणासाठी शासनाने लक्षावधी रूपये खर्च केले. परंतू पाणीसाठा वाढविण्यासाठी खोलीकरणाचा उपयोग झालेला नाही. कारण जिथे पाणी पसरावा अशाच ठिकाणी अतिक्रमण करून लोकांनी घर बांधलेले आहेत. भरघोष मत्स्य उत्पादनासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भविष्यात तलावाचा पाणीसाठा कमी होवून त्याचा मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.