शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

अतिक्रमणाचे विळख्यात तलाव

By admin | Updated: March 28, 2017 00:19 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे.

नियोजनाचा अभाव : मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम, लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?अशोक पारधी पवनी भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद मालकीचे तलाव आहे. त्यासर्व तलावावर सभोवताल लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. भोईतलाव, बालसमुद्र व कुऱ्हाडा असे तीन महत्वाचे तलाव पालिका क्षेत्रात आहेत. तीनही तलाव अतिक्रमणाचे विळख्यात जखडलेले आहेत.भाईतलाव वॉर्डात असलेले भाईतलाव हे तलाव जिल्हा परीषदच्या मालकीचे आहे. लक्षावधी रूपये खर्च करून शासनाने रोजगार निर्मिती करून तलावाचे खोलीकरण केले. मत्स्य उत्पादनासाठी तलाव वापरात आहे. गेल्या १० वर्षापूर्वी तलाव सर्व बाजूने दिसत होते. आता मात्र पाळीवर चढल्यानंतर सभोवताल अतिक्रमण झालेले तलाव पाहता येते. सर्व बाजूला अतिक्रमण असल्याने तलावात पाणीसाठा वाढवू शकत नाही त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. प्रसिद्ध असलेल्या परकोटाचे पायथ्याशी बालसमुद्र नावाचे तलाव आहे. एका बाजूला पुरातन असलेली मातीची भिंत (टेकडी) म्हणजेच तलावाची पाळ आहे. दुसऱ्या बाजुला जगन्नाथ मंदीर, चंद्रमनी विहार व पर्यटन संकूल आहे. उर्वरित दोन बाजूवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.पवनी-निलज रस्त्याचे बाजुला प्रसिद्ध असलेले कुऱ्हाडा तलाव. तलावाचे पाळीवर लोकांनी राहत्या घरासाठी व लहान लहान उद्योगासाठी अतिक्रमण केलेले आहे. तलावाची दुसरी बाजू म्हणजे बस्तरवारी व बेलघाटा वॉर्ड. या भागात लोकांनी रहाण्यासाठी घर बांधताना तलावाचे मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. या तलावाचे खोलीकरणासाठी शासनाने लक्षावधी रूपये खर्च केले. परंतू पाणीसाठा वाढविण्यासाठी खोलीकरणाचा उपयोग झालेला नाही. कारण जिथे पाणी पसरावा अशाच ठिकाणी अतिक्रमण करून लोकांनी घर बांधलेले आहेत. भरघोष मत्स्य उत्पादनासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भविष्यात तलावाचा पाणीसाठा कमी होवून त्याचा मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.