शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजना ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: June 4, 2015 00:34 IST

समाजातील दारिद्र्य रेषेखालील घटक तसेच निराधारांना हातभार लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध

पायपीट : बँकांची उदासीनता कारणीभूततुमसर : समाजातील दारिद्र्य रेषेखालील घटक तसेच निराधारांना हातभार लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेमधून आर्थिक मदत केली जाते. परंतु ही मदत लाभार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. मदतीची रक्कम मिळविताना लाभार्थ्यांना मोठी दमछाक करावी लागत आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे वेळेवर पैसे मिळत नाही. वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.राज्य व केंद्र शासनाकडून अपंग, विधवा व वृद्ध व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विकलांग योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना अशा विविध योजना शासनाने सुरु केल्या आहेत. या योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थ्याला साधारणत: ६०० रुपये दरमहा अनुदान दिले जाते. यात राज्य शासनाने ४०० तर केंद्र शासनाचे २०० असे मिळून ६०० रुपये अनुदान दिले जाते. राज्य शासन पेंशन टपाल कार्यालयामार्फत तर केंद्र शासनाकडून येणारे अनुदान राष्ट्रीयकृत बँकामार्फत मिळते. टपाल कार्यालयाकडून दिले जाणारे अनुदान मिळण्यास विलंब होत नाही. परंतु बँकाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी लाभार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. बँकांमध्ये वारंवार हेलपाटे मारूनही अनुदान वेळेवर मिळत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील बँकांबाबत लाभार्थ्यांचा अनुभव वाईट आहे. लिंक फेल आहे. पुरावे जोडा असे विविध कारणे समोर केली जात आहे. त्यामुळे बँकात चकरा मारूनही लाभार्थ्यांच्या हातात काहीच मिळत नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बँकांच्या दृष्टिकोनात बदल व्हावाशेतकऱ्यांची कर्जप्रकरणे, शासनाच्या विविध योजनांची अनुदाने व इतर कामाचा बोजा यामुळे निराधार अनुदान योजनाच्या लाभार्थ्यांना शेवटच्या स्थानावर फेकल्यासारखे चित्र आहे. यात एखाद्या लाभार्थ्यांचे बँक कर्ज असेल तर ते अनुदानही त्याला दिले जात नाही. कर्जातच कपात केली जात आहे.यामुळे निराधार योजनेचे लाभार्थी अनुदानापासून उपेक्षितच राहत आहे.