शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रॉयल्टीविना रेतीचे सर्रास उत्खनन

By admin | Updated: June 1, 2016 01:49 IST

पवनी तालुक्यात आठ रेतीघाट आहेत. रेतीची वाढती चोरी लक्षात घेता शासनाने रेतीघाट लिलाव केले.

पवनी तालुक्यातील प्रकार : जिल्हा परिषद सदस्याने केली चौकशीची मागणीपवनी : पवनी तालुक्यात आठ रेतीघाट आहेत. रेतीची वाढती चोरी लक्षात घेता शासनाने रेतीघाट लिलाव केले. मात्र लिलाव होऊनही तीच परिस्थती आहे. गुडेगाव रेतीघाटातून रात्रंदिवस रेतीचा उपसा सुरू आहे. शासन नियमाला रेतीघाट मालकाने धाब्यावर ठेवून मनमर्जी कारभार सुरू आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य मनोरथा जांभुळे यांनी केला आहे. गुडेगाव रेतीघाटावरुन रेती नेताना रॉयल्टीसाठी एक हजार रुपये व विनारॉयल्टी रेती पाहिजे असल्यास ५०० रुपये मोजावे लागत आहे. पवनी तालुक्यात हे नियम कुणी ठरविले व त्यावर कुणाचा वरदहस्त आहे, हे कळेनासे झाले आहे. शासनाच्या नियमानुसार रेती घाटावरुन रेती भरुन नेतांनी प्रत्येक ट्रीपला नवीन रॉयल्टी घ्यावी लागते. अशी नोंद तत्काळ द्यावी लागते. मात्र गुडेगाव रेती घाटावरुन नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. ट्रॅक्टर मालकाकडून २०० रूपये घेऊन रॉयल्टी दिल्या जात नाही. ट्रक, ट्रिप्पर सकाळच्या पहिल्या ट्रीपला रॉयल्टी घेतात. मग दिवसभर ५००रुपये देवून विना रॉयल्टीने रेती नेत आहेत. रेतीघाट लिलावापूर्वी महसुल विभागातर्फे प्रभारी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस यांचे संयुक्त फिरते पथक होते. त्यावेळी दररोज १० ते १५ ट्रॅक्टर ट्रॅक पकडून त्यांचेकडून दंडाची रक्कम वसूल केली जात होती. मात्र हे फिरते पथक भटकांनी दिसत नाही. याचा फायदा रेतीमाफीयाकडून होत आहे. शासनाच्या नियमनानुसार रेतीघाटाचे लिलाव झाल्यावर त्या रेतीघाटाची सीमा निश्चित केली जाते. त्याच क्षेत्रातील रेतीचा उपसा करणे बंधनकारक असते. (तालुका प्रतिनिधी)