शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी धान पीक विक्रीची ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST

केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानपीक, मक्कापीक विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३० ...

केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानपीक, मक्कापीक विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, देण्यात आलेला कालावधीत अनेकदा ऑनलाईन नोंदणी करण्याची साइड व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ३० मेपर्यंत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने ऑनलाईन नोंदणीकरिता संकेतस्थळ तयार करून १ मे ते ३० जूनपर्यंत चालणाऱ्या धानपीक, मक्कापीक खरेदीसाठी रब्बी हंगामातील धान व मक्का विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा, नमुना आठ, बँक पासबुकची झेराॅक्स प्रत अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ३० एप्रिलला दिली होती. परंतु, या कालावधीत साइड बरोबर चालत नव्हती. त्यामुळे अनेक शेतकरी या ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे आदिवासी विकास महामंडळ रब्बी हंगामातील धान घेणार किंवा नाही अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून या भागात कोरोनाचा विस्फोट होऊन संचारबंदी लावण्यात आली होती. या लॉकडाऊन कालावधीत शेतकरी बाहेर पडण्यास घाबरत होते. त्याचबरोबर महामंडळाने दिलेले संकेतस्थळ बंद होते. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत ३० मेपर्यंत वाढविण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले, विनोद बाबूराव गहाणे, योगेश पाटील नाकाडे यांनी केली आहे.

मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन

जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे, तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी बाहेर पडता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आदिवासी विकास महामंडळाने रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी नोंदणी करण्याला मुदतवाढ द्यावी, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.