शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शासन योजना गरजवंतांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: April 2, 2017 00:28 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : सुकळीत डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटनचुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे. विकासाला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. यामुळे देशात वैज्ञानिक विचारसरणीचा उदय होत आहे. नागरिकांना संगणक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.सुकळी नकुल येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेत डिजीटल वर्ग खोलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिशुपाल पटले, माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, माजी सभापती कलाम शेख, कृउबाचे संचालक राजेश पटले, चांदपुर देवस्थान अध्यक्ष अजय खंगार, पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे, महेश रहांगडाले, अंबादास कानतोडे, बिनाखीचे उपसरपंच देवेंद्र मेश्राम, सरपंच सुशिला रहांगडाले, सचिव आर.के. वैद्य, गटशिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, केंद्र प्रमुख कटणकार उपस्थित होते.खासदार पटोले म्हणाले, सुकळी नकुल येथील जिल्हा परिषदेची शाळा जिल्ह्यात पहिली "वायफॉय" युक्त शाळा झाली आहे. शाळा लोक सहभाातून डिजीटल करण्यात आली आहे. अन्य शाळांना प्रेरणादायक ठरावे असे उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. डिजीटल वर्ग खोली कुलुपबंद पर्यंत मर्यादीत ठेवण्यात येवू नये, विद्यार्थ्यांनी डिजिटलचे ज्ञान दिले पाहिजे. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी शेतकऱ्यांचे समस्याकडे खासदार पटोले यांचे लक्ष वेधले तर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.एम. तुरकर यांनी केले. संचालन के.एस. चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.आर. कटरे यांनी केले. (वार्ताहर)