शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: March 1, 2017 00:27 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणात १०५ टी.एम.सी. पाणीसाठा दरवर्षी साठत असून त्यापैकी ५७ टीएमसी पाण्याचा वापर केला जातो.

उदय सामंत यांचे निर्देश : विधानमंडळ अंदाज समितीकडून गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी, प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या समस्याभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणात १०५ टी.एम.सी. पाणीसाठा दरवर्षी साठत असून त्यापैकी ५७ टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. सिंचनासाठी केवळ ३९ टीएमसी पाणी वापरले जाते. हा पाणीसाठा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्यास सिंचनासाठी लाभ होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन गोसीखुर्द धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिले. गोसेखुर्द धरणाची पाहणी करण्यासाठी अंदाज समितीचे पदाधिकारी आज मंगळवारला भंडारा जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्षासह सदस्यांनी आज गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. अंदाज समितीचे अध्यक्ष आ.उदय सामंत, सदस्य आ.चरण वाघमारे, आ.डॉ.मिलींद माने, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.शरद रणपिसे होते. आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपवनसंरक्षक उमेश वर्मा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रदिपकुमार डांगे, मुख्य अभियंता जे.एम. शेख, उपजिल्हाधिकारी विजया बनकर व जी.जी. जोशी उपस्थित होते.जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत समितीसमोर सादरीकरण केले. जलाशयाची लांबी जास्त असल्यामुळे १०.८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे त्यांनी सांगितले. १०५ टीएमसी पाणीसाठा दरवर्षी होत असून सिंचनासाठी ३९ टीएमसी पाणी वापरले जाते. हे प्रमाण वाढणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. गोसीखुर्द धरण क्षेत्रात येणाऱ्या तीन जिल्ह्यातील २ लाख ५० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोसेखुर्दचे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचावे, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली. यावेळी समितीने मागील तीन वर्षाच्या खर्चाचा आढावा, प्रलंबित कामे, भू-संपादनाची स्थिती, प्रकल्पग्रस्तांना मोबदला, पुनर्वसन आदी विषयांचा आढावा घेतला. त्यानंतर समिती सदस्यांनी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. गोसेखुर्द प्रकल्पाजवळ निमार्णाधीण असलेल्या वीज प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. समिती सदस्यांनी या प्रकल्पासंबंधी सूचना केल्या. प्रकल्पात येणाऱ्या भागाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याची व त्यांना भू-संपादनासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. समितीच्या सदस्यांनी नेरला उपसा सिंचन योजनेला भेट देऊन पाहणी केली. या समितीसोबत सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव शिवदर्शन साठे, अव्वर सचिव श्रीकांत शेटये व कक्ष अधिकारी विजय कोमटवार उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)नाग नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेलानागपूर येथील नागनदीचे प्रदूषित पाणी गोसेखुर्द जलाशयात येत असल्याची बाब यावेळी समितीच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यामुळे भंडारा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यावर समितीने नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी चर्चा करण्याच्या व नागनदीचे पाणी जलाशयात येणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यानंतर समिती सदस्यांनी चिचखेडा या पुनर्वसित गावाची पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा केली. चिचखेडा येथील नागरी सुविधा, पिण्याचे पाणी, रोजगार आदी समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन समितीने यावेळी दिले.