शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

चौपदरीकरणातून होणार राज्य मार्गाचा विस्तार

By admin | Updated: August 30, 2016 00:20 IST

वाढती लोकसंख्या, वाढत्या दळणवळणाची साधने व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाने एकेरी रस्त्याचे दुहेरी व दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ठरविले आहे.

धडपड वाढली : एन.एच.ए. आय. चा सर्वेक्षण सुरुविलास बन्सोड उसर्रावाढती लोकसंख्या, वाढत्या दळणवळणाची साधने व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाने एकेरी रस्त्याचे दुहेरी व दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामटेक ते गोंदिया राज्य मार्ग क्र. ३३५ चे चौपदरीकरणाचे एन.एच.ए.आय. चे सर्वेक्षण सुरु झाले आहे.वाढत्या साधन सामुग्रीमुळे जुने रस्ते अपुरे पडत आहे. यासाठी शासनाने अशा रस्त्यांना मंजुरी देण्यात आले असल्याचे बोलले जाते आहे. एनएचएआय म्हणजे नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया ही नामांकित कंपनीने रामटेक ते गांदिया या राज्य मार्ग क्रमांक ३३५ वर सदर रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे. रस्ता चौपदरीकरण व्हावा यासाठी रस्त्याच्या केंद्रबिंदू पासून २० मीटर लांब रस्ता आता चौपदरीकरण होणार आहे. येत्या काही दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार असून एन.एच.ए.आय. आपला सर्वे पी.आय.डी.सी. नोएडा ला देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावर संबंधित विभाग सदर चौपदरीकरण रस्त्याच्या अंदाजपत्रक बनवणार असे समजते.सध्या तुमसर- रामटेक राज्यमार्गावर असलेल्या उसर्रा येथे एनएचएआय चा सर्वेक्षण सुरु आहे. सदर रस्ता चौपदरीकरण होत असून रस्त्याच्या कायापालट होणार हे सत्य आहे. पण रामटेक ते गोंदिया या राज्यमार्गावर बरेचसे गावे रस्त्यावर लागून असल्याने व त्यांच्या २० मीटर जागा रस्त्यात जाणार असल्याने नागरिकांचे घरे रस्त्यात जाणार म्हणून नागरिकांची धडपड वाढली आहे. पुनर्वसनाचे काय?रामटेक - गोंदिया मार्गावरील हिवरा, वासेरा, कांद्री, जांब, धोप, सालई खुर्द, उसर्रा, काटेबाम्हणी, खापा सदर गावे रस्त्यालगत आहेत. येथील बरीच घरे, जमीन सदर चौपदरीकरण रस्त्यात जाणार आहे. पण त्या घराचे पुर्नवसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी असे सर्वदूर बोलले जात आहे. शासनाने सर्वेक्षण सुरु जरी केला असला तरी आतापासून नागरिकांनी सावरासावर करायला सुरुवात केली आहे. सर्वात जास्त फटका कांद्री, सालई खुर्द, धोप, उसर्रा व खापा या गावांना बसणार आहे. चौपदरीकरणातून रस्त्याचे कायापालट होईल. पण पुनर्वसनाचा प्रश्न आतापासून भेडसावू लागला आहे. रस्त्यावर काहींनी आपली उपजिवीकेसाठी लावलेली चहापान दुकानदारांचे स्वप्न भंगणार असून त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर येईल. शासन याकडे लक्ष देईल काय?सध्या सदर रस्ता तयार होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. रस्त्याच्या केंद्रबिंदूपासून १७५ फूट लांब असा रस्ता आहे. गावालगतच्या जागेला ही लांबी कदाचित कमी असेल. पुर्नवसनाचे काम शासनस्तरावर केले जाईल. पण सध्या वेळ आहे.-प्रभाकर कापगते,शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी