शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

राष्ट्रीय महामार्गाचे शहरात लवकरच विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:02 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे८७ कोटींचा निधी : फुलमोगरा ते कारधा टोलनाका

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुंबई-कोलकाता या महामार्गावर अहोरात्र वाहतूक सुरू असते. भंडारा येथे बायपास नसल्याने शहराच्या मध्यभागातून ही वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीसह ट्रेलर धावत असतात. शहरातील या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध कार्यालय आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भंडारा शहर विस्तारले आहे. त्यामुळे नागरिकांना हा महामार्ग ओलांडूनच जावे लागते.अहोरात्र वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागतो. वाहतूक पोलिसांची चौकात नियुक्ती असली तरी वाहतुकीची कायम कोंढी असते. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वावर उपाय करण्यासाठी भंडारा येथील नागरिकांनी वारंवार महामार्ग प्राधीकरणाकडे मागणी केली. एक तर भंडारा शहराला बायपास आणि दुसरे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण करावे, अशीही मागणी आहे.सध्या शिंगोरी फाटा ते बेला हा १० कि़मी. चा मार्ग दुपदरी आहे. त्यावरूनच ही वाहतूक सुरू होते. एखादा अपघात झाल्यास तासनतास वाहतुकींची कोंडी होते. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले. ते कुठे गेले हे कळले नाही. रस्त्याचे मोजमाप झाल्यानंतरही शासन मान्यता मिळत नसल्याने संभ्रम कायम होता. दरम्यान महामार्ग प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. नमेके काम कधी सुरू होणार हे मात्र खात्रीशीरपणे कुणीही सांगत नाही.भंडाऱ्यात बायपासजिल्हा मुख्यालयाचे केंद्रबिंदू असलेल्या भंडारा शहरातून उड्डाणपूल होणार ही आशा मावळली आहे. भंडारालगतच्या कोरंभी परिसरातून हा बायपास मार्ग निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय वैनगंगा नदीपात्रात नवीन पुलाची निर्मितीही करण्यात येईल. याला प्रशासकीय स्तरावर दुजोरा देण्यात आला असून शहरातील विस्तारीकरणाच्या कामाला यासोबतच प्रारंभ होईल.