शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

राष्ट्रीय महामार्गाचे शहरात लवकरच विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:02 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे८७ कोटींचा निधी : फुलमोगरा ते कारधा टोलनाका

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुंबई-कोलकाता या महामार्गावर अहोरात्र वाहतूक सुरू असते. भंडारा येथे बायपास नसल्याने शहराच्या मध्यभागातून ही वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीसह ट्रेलर धावत असतात. शहरातील या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध कार्यालय आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भंडारा शहर विस्तारले आहे. त्यामुळे नागरिकांना हा महामार्ग ओलांडूनच जावे लागते.अहोरात्र वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागतो. वाहतूक पोलिसांची चौकात नियुक्ती असली तरी वाहतुकीची कायम कोंढी असते. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वावर उपाय करण्यासाठी भंडारा येथील नागरिकांनी वारंवार महामार्ग प्राधीकरणाकडे मागणी केली. एक तर भंडारा शहराला बायपास आणि दुसरे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण करावे, अशीही मागणी आहे.सध्या शिंगोरी फाटा ते बेला हा १० कि़मी. चा मार्ग दुपदरी आहे. त्यावरूनच ही वाहतूक सुरू होते. एखादा अपघात झाल्यास तासनतास वाहतुकींची कोंडी होते. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले. ते कुठे गेले हे कळले नाही. रस्त्याचे मोजमाप झाल्यानंतरही शासन मान्यता मिळत नसल्याने संभ्रम कायम होता. दरम्यान महामार्ग प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. नमेके काम कधी सुरू होणार हे मात्र खात्रीशीरपणे कुणीही सांगत नाही.भंडाऱ्यात बायपासजिल्हा मुख्यालयाचे केंद्रबिंदू असलेल्या भंडारा शहरातून उड्डाणपूल होणार ही आशा मावळली आहे. भंडारालगतच्या कोरंभी परिसरातून हा बायपास मार्ग निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय वैनगंगा नदीपात्रात नवीन पुलाची निर्मितीही करण्यात येईल. याला प्रशासकीय स्तरावर दुजोरा देण्यात आला असून शहरातील विस्तारीकरणाच्या कामाला यासोबतच प्रारंभ होईल.