शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे शहरात लवकरच विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:02 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे८७ कोटींचा निधी : फुलमोगरा ते कारधा टोलनाका

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुंबई-कोलकाता या महामार्गावर अहोरात्र वाहतूक सुरू असते. भंडारा येथे बायपास नसल्याने शहराच्या मध्यभागातून ही वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीसह ट्रेलर धावत असतात. शहरातील या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध कार्यालय आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भंडारा शहर विस्तारले आहे. त्यामुळे नागरिकांना हा महामार्ग ओलांडूनच जावे लागते.अहोरात्र वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागतो. वाहतूक पोलिसांची चौकात नियुक्ती असली तरी वाहतुकीची कायम कोंढी असते. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वावर उपाय करण्यासाठी भंडारा येथील नागरिकांनी वारंवार महामार्ग प्राधीकरणाकडे मागणी केली. एक तर भंडारा शहराला बायपास आणि दुसरे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण करावे, अशीही मागणी आहे.सध्या शिंगोरी फाटा ते बेला हा १० कि़मी. चा मार्ग दुपदरी आहे. त्यावरूनच ही वाहतूक सुरू होते. एखादा अपघात झाल्यास तासनतास वाहतुकींची कोंडी होते. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले. ते कुठे गेले हे कळले नाही. रस्त्याचे मोजमाप झाल्यानंतरही शासन मान्यता मिळत नसल्याने संभ्रम कायम होता. दरम्यान महामार्ग प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. नमेके काम कधी सुरू होणार हे मात्र खात्रीशीरपणे कुणीही सांगत नाही.भंडाऱ्यात बायपासजिल्हा मुख्यालयाचे केंद्रबिंदू असलेल्या भंडारा शहरातून उड्डाणपूल होणार ही आशा मावळली आहे. भंडारालगतच्या कोरंभी परिसरातून हा बायपास मार्ग निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय वैनगंगा नदीपात्रात नवीन पुलाची निर्मितीही करण्यात येईल. याला प्रशासकीय स्तरावर दुजोरा देण्यात आला असून शहरातील विस्तारीकरणाच्या कामाला यासोबतच प्रारंभ होईल.