शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 15, 2016 01:01 IST

जिल्हा जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या

भंडारा : जिल्हा जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात असलेल्या मामा तलावांचे अस्तित्व अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे. एकेकाळी बाराही महिने तुडूंब राहणारे तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एवढेच नाहीतर अनेक तलाव बेपत्ता झाले आहेत. काही तलाव सोडले तर कोणत्याही तलावात पाहिजे त्या प्रमाणात पुरेसे पाणी दिसून येत नाही. जिल्ह्यात पुरातन काळापासून मालगुजारी तलाव आहेत. त्यामुळेच हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्यास्थितीत जिल्हयातील मालगुजारी तलावांची परिस्थिती पाहिली तर, हे मालगुजारी तलाव मातीने भरण्यासोबतच अतिक्रमणामुळे प्राचीन वारसाचे अस्तित्व संकटात आल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेकडून लक्ष देण्यात न आल्यामुळे मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बांध तसेच तलाव एकतर मातीने भरण्यात आले किंवा अतिक्रमण करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधील बोडी व तलाव मातीने बुजवून सपाट करण्यात आले. यानंतर तेथे भूखंड पाडून त्यांची विक्री सुद्धा करण्यात आली आणि त्यावर आता अनेक वसाहती तयार झालेल्या आहेत. मालगुजारी तलाव लुप्त होण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील तलावांवर वाढते अतिक्रमण तसेच प्राचीन मालगुजारी तलावांकडे लक्ष न दिल्यामुळे तलावांची जलक्षमता कमी झालेली आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के तलाव असे आहेत, जे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून आहेत. अनेक तलाव तर पूर्णत: बुजून गेले व त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही वर्षांत मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होईल, यात शंका नाही.मोहाडी तालुक्यातील करडी परिसर 'तलावांचा परिसर' म्हणून ओळखला जातो. वैनगंगेच्या पूर्व काठावरील शेती सुपीक असून कृषीपंपाची सोय आहे. मात्र कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी असलेला मोठा परिसर तलावांच्या सिंचनावर अवलंबून आहे. संपूर्ण क्षेत्र सिंचनाने बकाल झाला आहे. केवळ खरीप पिकांपुरते पाणी साठविण्याची क्षमता येथील तलावात आहे. मात्र ते सुध्दा मिळू शकले नाही. त्यामुळे तलावांच्या पायथ्याशी शेतीमध्ये दुष्काळाच्या मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येते. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात देव्हाडा, मोहगाव, नवेगाव, जांभळापाणी, करडी, किसनपूर, लेंडेझरी, जांभोरा, केसलवाडा, पालोरा, खडकी, ढिवरवाडा, बोंडे, डोंगरदेव आदि तालुक्यातील गावात लहान मोठ्या तलावांची संख्या अधिक आहे. याही व्यतिरिक्त परिसराला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, लोहारा, चंद्रपूर माटोरा, नवेगाव आदी गावांतही तलावाची संख्या बरीच आहे. बऱ्याच तलावांच्या गेट नादुरुस्त आहेत. तसेच तलावांच्या पाळ कमकुवत आहेत. तलाव गाळाने भरलेले असल्याने सपाट झाली आहेत. सर्व तलावांमध्ये कमीअधिक जास्त प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बऱ्याचवेळी अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलने करण्यात येतात. परंतु, काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती 'जैसे-थे' राहते आणि प्रश्न मात्र कायम राहतो. (नगर प्रतिनिधी)