शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

थकीत बिलापोटी शेतकऱ्यांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST

महावितरण कंपनीने थकीत बिलासाठी सवलत जाहीर केली होती. त्यात अत्यल्प शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. पैशाअभावी या योजनेत अनेक शेतकरी सहभागी ...

महावितरण कंपनीने थकीत बिलासाठी सवलत जाहीर केली होती. त्यात अत्यल्प शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. पैशाअभावी या योजनेत अनेक शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. गत दोन वर्षांपासून शेतकरी संकटाने बेजार आहे. कोरोना संकटाने शेतकऱ्यांची वाट लावली. पोट भरायचे की वीजबिल भरायचे? हा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला. गत खरिपातील पूर्ण बोनस मिळू शकला नाही. उन्हाळी धानाची रक्कमसुद्धा शासनावर थकीत आहे. त्यामुळे शेतकरी वापरलेल्या विजेचा भरणा करण्यास असमर्थ ठरला आहे. परिणामी चूलबंद खोऱ्यांतील अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बॉक्स

वीजपुरवठा खंडित करू नका

पालांदूर येथील महावितरण कार्यालयात ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी शेतकऱ्यांसह भेट देऊन वीज कापणीची समस्या जाणून घेतली. हप्ताभरात शासनाकडून धान खरेदीचे पैसे येण्याची शक्यता आहे. त्या पैशातून वीजबिल शेतकरी भरेल. त्यामुळे वीज कापणीचा धडाका थांबवावा, असे आवाहन महावितरणला केले.

थकीत शेतकऱ्यांनी किमान बिलाच्या चाळीस टक्के रक्कम भरावी. थकीत शेतकऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने नाइलाजाने वीज कापली जात आहे. वरिष्ठ स्तरावरून आलेल्या पत्रानुसार थकीत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

- मयंक सिंग, सहायक अभियंता महावितरण कार्यालय पालांदूर