शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

ग्रामस्तरावरील उघड्या हागणदारीला हद्दपार करा

By admin | Updated: August 24, 2016 00:15 IST

वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात.

कविता बनकर यांचे प्रतिपादन : बोरी येथून कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ, गृहभेटीतून दिला शौचालय बांधण्याचा संदेशतुमसर : वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही बाब कुटुंबासाठी सन्मानपूर्वक नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावरील हागणदारीला हद्दपार करावे, असे प्रतिपादन तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर यांनी केले. पंचायत समिती तुमसर, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) यांचे वतीने २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या राज्यव्यापी कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ सोमवार २२ आॅगस्टला ग्रामपंचायत बोरी येथे करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर, सरपंच भाऊराव उपरीकर, उपसरपंच शांताबाई कांबळे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, ग्राम पंचायत सदस्य राधेश्याम कांबळे, मायाबाई डोंगरवार, सचिव सेलोकर, समूह समन्वयक अनिता कुकडे, शशीकांत घोडीचोर, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. सभापती बनकर म्हणाल्या, प्रत्येक गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याची सुरुवात विकास प्रक्रियेतून होत आहे. प्रत्येक गावातील कुटुंबांनी शौचालय बांधकाम व वापर केल्याशिवाय गावांचा विकास अशक्य आहे. प्रत्येक गाव हा हागणदारीमुक्त झाला पाहिजे. याकरिता कुटुंबांनी शौचालय बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कुटुंबांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर केल्यास घर, गाव सुंदर व स्वच्छ करता येईल. याकरिता सामूहिकरित्या उघड्या हागणदारीला हद्दपार करण्याची योग्य वेळ आलेली आहे, असे सांगितले.गट विकास अधिकारी हिरुडकर म्हणाले, शौचालयाअभावी नागरिक हातात बिसलेरीची बॉटल, टमरेल धरून उघड्यावर हागणदारीला जातात. ही प्रत्येक कुटुंबासाठी सन्मानाची बाब नाही. यामुळे कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. मान सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील आईवडील, पत्नी, मुली, सुन, बालके यांचेसाठी शौचालय बांधकाम करणे आवश्यक आहे. घरी शौचालय नसल्यामुळे गावातील, घरातील वातावरण आल्हाददायक राहत नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून मोठ्या प्रमाणात मिळकत खर्ची होते. पिण्याचे पाणी सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे कुटुंब तेथे शौचालय हे सूत्र लक्षात घेता बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले व बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहनपर राशी त्वरीत देण्याची ग्वाही यावेळी दिली.माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे यांनी कुटुंब संवाद अभियान राबविण्यामागचा उद्देश सांगून नागरिकांना प्रत्येक घर हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी संवाद गटाची निर्मिती करून त्या गटांना गृहभेटीतून स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. गावात सर्वप्रथम शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या सुपचंद कांबळे यांचा सभापती व गट विकास अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावात सभापती कविता बनकर, गटविकास अधिकारी हिरुडकर, सरपंच उपरीकर व पदाधिकारी, कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीत शौचालय नसणाऱ्या कुटुंबाकडे गृहभेटीतून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)