शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्तरावरील उघड्या हागणदारीला हद्दपार करा

By admin | Updated: August 24, 2016 00:15 IST

वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात.

कविता बनकर यांचे प्रतिपादन : बोरी येथून कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ, गृहभेटीतून दिला शौचालय बांधण्याचा संदेशतुमसर : वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही बाब कुटुंबासाठी सन्मानपूर्वक नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावरील हागणदारीला हद्दपार करावे, असे प्रतिपादन तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर यांनी केले. पंचायत समिती तुमसर, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) यांचे वतीने २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या राज्यव्यापी कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ सोमवार २२ आॅगस्टला ग्रामपंचायत बोरी येथे करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर, सरपंच भाऊराव उपरीकर, उपसरपंच शांताबाई कांबळे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, ग्राम पंचायत सदस्य राधेश्याम कांबळे, मायाबाई डोंगरवार, सचिव सेलोकर, समूह समन्वयक अनिता कुकडे, शशीकांत घोडीचोर, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. सभापती बनकर म्हणाल्या, प्रत्येक गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याची सुरुवात विकास प्रक्रियेतून होत आहे. प्रत्येक गावातील कुटुंबांनी शौचालय बांधकाम व वापर केल्याशिवाय गावांचा विकास अशक्य आहे. प्रत्येक गाव हा हागणदारीमुक्त झाला पाहिजे. याकरिता कुटुंबांनी शौचालय बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कुटुंबांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर केल्यास घर, गाव सुंदर व स्वच्छ करता येईल. याकरिता सामूहिकरित्या उघड्या हागणदारीला हद्दपार करण्याची योग्य वेळ आलेली आहे, असे सांगितले.गट विकास अधिकारी हिरुडकर म्हणाले, शौचालयाअभावी नागरिक हातात बिसलेरीची बॉटल, टमरेल धरून उघड्यावर हागणदारीला जातात. ही प्रत्येक कुटुंबासाठी सन्मानाची बाब नाही. यामुळे कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. मान सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील आईवडील, पत्नी, मुली, सुन, बालके यांचेसाठी शौचालय बांधकाम करणे आवश्यक आहे. घरी शौचालय नसल्यामुळे गावातील, घरातील वातावरण आल्हाददायक राहत नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून मोठ्या प्रमाणात मिळकत खर्ची होते. पिण्याचे पाणी सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे कुटुंब तेथे शौचालय हे सूत्र लक्षात घेता बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले व बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहनपर राशी त्वरीत देण्याची ग्वाही यावेळी दिली.माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे यांनी कुटुंब संवाद अभियान राबविण्यामागचा उद्देश सांगून नागरिकांना प्रत्येक घर हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी संवाद गटाची निर्मिती करून त्या गटांना गृहभेटीतून स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. गावात सर्वप्रथम शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या सुपचंद कांबळे यांचा सभापती व गट विकास अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावात सभापती कविता बनकर, गटविकास अधिकारी हिरुडकर, सरपंच उपरीकर व पदाधिकारी, कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीत शौचालय नसणाऱ्या कुटुंबाकडे गृहभेटीतून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)