शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ग्रामस्तरावरील उघड्या हागणदारीला हद्दपार करा

By admin | Updated: August 24, 2016 00:15 IST

वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात.

कविता बनकर यांचे प्रतिपादन : बोरी येथून कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ, गृहभेटीतून दिला शौचालय बांधण्याचा संदेशतुमसर : वर्षानुवर्षापासून ग्रामस्तरावर कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने आजही अनेक गावात नागरिक उघड्यावर शौचास जातात. ही बाब कुटुंबासाठी सन्मानपूर्वक नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावरील हागणदारीला हद्दपार करावे, असे प्रतिपादन तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर यांनी केले. पंचायत समिती तुमसर, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) यांचे वतीने २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या राज्यव्यापी कुटुंब संवाद अभियानाचा शुभारंभ सोमवार २२ आॅगस्टला ग्रामपंचायत बोरी येथे करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर, सरपंच भाऊराव उपरीकर, उपसरपंच शांताबाई कांबळे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, ग्राम पंचायत सदस्य राधेश्याम कांबळे, मायाबाई डोंगरवार, सचिव सेलोकर, समूह समन्वयक अनिता कुकडे, शशीकांत घोडीचोर, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. सभापती बनकर म्हणाल्या, प्रत्येक गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याची सुरुवात विकास प्रक्रियेतून होत आहे. प्रत्येक गावातील कुटुंबांनी शौचालय बांधकाम व वापर केल्याशिवाय गावांचा विकास अशक्य आहे. प्रत्येक गाव हा हागणदारीमुक्त झाला पाहिजे. याकरिता कुटुंबांनी शौचालय बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कुटुंबांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर केल्यास घर, गाव सुंदर व स्वच्छ करता येईल. याकरिता सामूहिकरित्या उघड्या हागणदारीला हद्दपार करण्याची योग्य वेळ आलेली आहे, असे सांगितले.गट विकास अधिकारी हिरुडकर म्हणाले, शौचालयाअभावी नागरिक हातात बिसलेरीची बॉटल, टमरेल धरून उघड्यावर हागणदारीला जातात. ही प्रत्येक कुटुंबासाठी सन्मानाची बाब नाही. यामुळे कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. मान सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील आईवडील, पत्नी, मुली, सुन, बालके यांचेसाठी शौचालय बांधकाम करणे आवश्यक आहे. घरी शौचालय नसल्यामुळे गावातील, घरातील वातावरण आल्हाददायक राहत नाही. आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून मोठ्या प्रमाणात मिळकत खर्ची होते. पिण्याचे पाणी सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे कुटुंब तेथे शौचालय हे सूत्र लक्षात घेता बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले व बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहनपर राशी त्वरीत देण्याची ग्वाही यावेळी दिली.माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे यांनी कुटुंब संवाद अभियान राबविण्यामागचा उद्देश सांगून नागरिकांना प्रत्येक घर हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी संवाद गटाची निर्मिती करून त्या गटांना गृहभेटीतून स्वच्छतेचा संदेश पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. गावात सर्वप्रथम शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या सुपचंद कांबळे यांचा सभापती व गट विकास अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावात सभापती कविता बनकर, गटविकास अधिकारी हिरुडकर, सरपंच उपरीकर व पदाधिकारी, कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीत शौचालय नसणाऱ्या कुटुंबाकडे गृहभेटीतून शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)