शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मध्यप्रदेशच्या रॉयल्टीवर जिल्ह्यातील घाटांवर रेती उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:52 IST

जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या आधारे मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. यातून महाराष्ट्र शासनाच्या महसुलाला लाखोंचा चुना लागत असून लिलावापूर्वीच घाटात दररोज मशीनद्वारे उत्खनन करून ट्रकद्वारे वाहतूक होत आहे.

ठळक मुद्देमहसूल विभाग हतबल : दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या आधारे मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. यातून महाराष्ट्र शासनाच्या महसुलाला लाखोंचा चुना लागत असून लिलावापूर्वीच घाटात दररोज मशीनद्वारे उत्खनन करून ट्रकद्वारे वाहतूक होत आहे.भंडारा जिल्ह्यातील रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून या रेतीचे उत्खनन करण्याचा सपाटा लावला आहे. दरवर्षी महसूल विभागाच्या वतीने रेती घाटांचे लिलाव केल्या जाते. रॉयल्टीची रक्कम वसुल करून रेती उत्खननाला परवानगी दिली जाते. मात्र यावर्षी अद्यापही जिल्ह्यातील ६२ पैकी एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. मात्र रेतीचे उत्खनन खुलेआम सुरु आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घाटावर अहोरात्र रेतीचे उत्खनन दिसून येते. यावर्षी अपुऱ्या पावसाने रेतीघाट लवकरच उघडे पडले. त्याचा फायदा तस्कर घेत आहेत.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, सूर या मोठ्या नद्यांसह विविध ठिकाणांवरून रेतीचे उत्खनन केले जात आहे. पोकलँड मशीनच्या सहाय्याने ट्रकमध्ये रेती भरून ती बिनदिक्कतपणे वाहतूक केली जाते. नदीपात्रात ट्रक जाण्यासाठी या तस्करांनी रस्तेही तयार केले आहेत. अनेकदा नदीची नैसर्गिक संरक्षण भिंत थडीही फोडली आहे. पवनी तालुक्यातील गुडेगाव, शिवनाळा, जुनोना, येनोळा, कुर्झा येथे राजरोस अवैध रेतीचे उत्खनन सुरु आहे. पवनी तालुक्यातील वाहणाऱ्या वैनगंगेच्या खोऱ्यातून रेती उत्खननासाठी मध्यप्रदेशाची रॉयल्टी दाखविली जाते. याच भरवशावर नागपूर व विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती विकली जाते. एकट्या पवनी तालुक्यातून दररोज शंभरावर रेती ट्रकचे उत्खनन होत असल्याचे दिसून येते. याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्ह्यातील रेतीचा हा मुद्दा नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्र्यांपुढेही उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उपस्थित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत सूचना दिल्या. मात्र त्यानंतर कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. अहोरात्र रेती वाहतूक सुरु असून यातून भानगडी निर्माण होत आहेत.महसूल आणि पोलिसांचे एकमेकांकडे बोटअवैध रेती उत्खनन हा विषय महसूलच्या अखत्यारीत येतो. मात्र महसूलची यंत्रणा अपुरी पडते. कारवाईसाठी गेल्यानंतर आक्रमक रेती तस्करांपुढे त्यांचे काहीही चालत नाही. त्यामुळे ते पोलिसांची मदत घेतात. मात्र अनेकदा महसूल आणि पोलीस विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. लाखो रुपयांच्या या अवैध तस्करीत अनेकांचे हात ओले झाल्याचेही दिसून येते.