शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

दाखल्यांसाठी ‘सेतू’त पायपीट

By admin | Updated: June 28, 2015 00:52 IST

दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर दाखल्यांची दहा पटीने आवक वाढली.

पालक संतप्त : ताटकळत राहावे लागते उभे, महसूल यंत्रणेने लक्ष देणे गरजेचेभंडारा : दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानंतर दाखल्यांची दहा पटीने आवक वाढली. यातून कामाचा ताण वाढला आहे. सद्य:स्थितीत सर्वच शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे विविध दाखल्यांसाठी सेतू केंद्रावर पालकांची प्रचंड गर्दी होत असते. परंतु पालकांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. पालकांना सेतू सुविधा केंद्रावर सारखे हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे. विविध दाखल्यांसाठी सेतू सुविधा केंद्रात अर्ज दाखल करताना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या संथगतीमुळे नागरिकांना दोन-दोन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. याशिवाय तेथे बसण्याची व्यवस्था नसल्याने तीन-चार दिवसांपूर्वी दोन जणांना चक्कर आल्याने ते खाली पडले होते. केंद्रावर लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे तेथे बसण्याची व्यवस्था व्हावी. शिवाय संगणकांची देखील संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने दखल घेण्याची मागणी पालकांनी केली आहे. शाळा - महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी पालकांना येथील सेतू सुविधा केंद्रात प्रचंड फिरफिर करावी लागत आहे. यासोबत तेथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने अक्षरश: वैतागले आहेत. संबंधित यंत्रणेनेदेखील साफ दुर्लक्ष केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हे दाखले तातडीने मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ यंत्रणेने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.शाळा-महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तथापि, प्रवेशासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. हे दाखले येथील नागरी सुविधा केंद्रामार्फत काढावे लागतात. त्यामुळे सेतू सुविधा केंद्रामार्फतच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या कागदपत्रांची पूर्तता करताना पालकांची अक्षरश: दमछाक होत आहे. कारण सेतू सुविधा केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित दाखला मिळण्यासाठी तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याची पालकांची व्यथा आहे. जेव्हा पालक तपास करतात तेव्हा संबंधित कर्मचारी विविध बहाणे बनवतात, कधी नेट बंद आहे, तर कधी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे पडून आहेत, असे सांगून पालकांना परतवून लावतात. त्यामुळे अक्षरश: वैताग आल्याची व्यथा पालकांनी बोलून दाखविली. कर्मचाऱ्यांच्या मनमानीबाबत पालकांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र त्यांनीही त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. परिणामी सेतू केंद कर्मचाऱ्यांचेही फावत असल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)ताटकळत राहावे लागते उभे सेतू केंद्रात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी शिकाऊ उमेदवार आहेत. त्यांना संगणकाचे सखोल ज्ञान नाही. परिणामी तेथे अक्षरश: सावळा गोंधळ सुरू असतो. पालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विविध दाखल्यांसाठी सेतू सुविधा केंद्रात अर्ज दाखल केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून १३ रुपयांची पावती दिली जाते. दिवसभरात शेकडो दाखले तयार करण्यासाठी येत असतात.