शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी

By admin | Updated: November 11, 2016 00:41 IST

जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन निवडणुका होत असले तरी १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

नगर परिषद निवडणूक : सामाजिक समिकरणावर भरभंडारा : जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन निवडणुका होत असले तरी १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यावयाचा असल्यामुळे या निवडणुतील लढती रंगतदार ठरणार आहेत. अशातच भंडारा व तुमसरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे याठिकाणच्या लढती चुरशीची होणार असून त्यापूर्वी उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. दरम्यान, विद्यमान नगरसेवक विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असले तरी पालिका निवडणुकीसाठी ईच्छुकांची पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी सुरू असून शहरात भेटीगाठींचा वेग वाढला आहे. भंडारा शहरात राजकीय पक्षांकडून मतांसाठी सामाजिक समिकरण साधण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या समाजातील मतदारसंख्या अधिक त्याच समाजातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्यावर भर आहे.भंडारा शहरात भाजपाकडून प्रबळ दावेदार संजय कुंभलकर हे असून सुर्यकांत ईलमे, सुनील मेंढे, चंद्रशेखर रोकडे, मंगेश वंजारी, राष्ट्रवादीकडून विद्यमान नगराध्यक्ष बाबूराव बागडे, भगवान बावनकर, धनराज साठवणे, काँग्रेसकडून सचिन घनमारे, शिवसेनेतून संजय रेहपाडे, अनिल गायधने, अ‍ॅड.रवी वाढई, भाकपकडून सदानंद ईलमे, ओबीसी एनटी पार्टीकडून शालीकराम झंझाळ यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक लढण्यादृष्टिने त्यांनी तयारी केली आहे. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माधव फसाटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक आहेत. याशिवाय बसपा, बीआरएसपी, एमआयएम या पक्षांकडून उमेदवार रिंगणात उभे केले जाणार आहे.भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी ७८,८११ मतदार असुन ३५ टक्के मते एकट्या तेली समाजातील आहेत. भंडारा शहरातील प्रत्येक प्रभागात तेली समाजाची मते अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील २३ ते २४ हजार ही मते निर्णायक ठरणारी आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाची बहुतांश मते भाजपाला मिळाली होती. त्यामुळे प्रत्येकच राजकीय पक्षांकडून या समाजातील उमेदवारांचा शोध सुरू आहे. भंडारा अर्बन बँकेच्या निवडणुकीत तेली समाजाला डावलण्यात आल्यामुळे भाजपा आणि शिवसेना हे पक्ष नगरपालिका निवडणुकीत कोणत्या समाजाला जवळ करतात आणि कुणाला उमेदवारी देतात, यावर विजयाचे समिकरण अवलंबून राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)