शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:42 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सुकळीत भागवत सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, खा.मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, बंडूभाऊ सावरबांधे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, रामलाल चौधरी, विनोद पटोले, अविनाश वारजूरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, बशीर पटेल आदी उपस्थित होते.उपस्थितांच्या समोर खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जनतेला खोटे आश्वासन देवून केंद्रात व राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर दिलेल्या आश्वासनांचा भाजप सरकारला विसर पडला. आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण केले नाही.जनतेची घोर निराशा केली. लोकांमध्ये सरकारविरोधात जनआक्रोश होता. हे नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आला. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुखी नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. सरकारने जे आश्वासन दिले त्या आश्वासनांची आतापर्यंत पूर्तता करण्यात आली नाही.जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न कायम आहे. रोजगाराचा प्रश्न कायम आहे. दुधाला भाव नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. शेतकºयांमध्ये सरकारविरोधात रोष उफाळत आहे.लहान मोठ्या व्यवसायीकांचे तर कंबरडेच मोडले. जिल्ह्यातील स्थानिक नेते फक्त विकासाच्या गप्पा मारतात. प्रत्यक्ष कृती करीत नाही. शेतकऱ्यांसाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. या सरकारला घोषणा करण्याशिवाय काहीच दिसत नाही. जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. चार वर्षात एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नवीन रोजगार उपलब्ध करण्यात आलेला नाही. भेल प्रकल्पाचे काम सुरु करण्यास हे सरकार अपयशी ठरले. जनतेला कळून चुकले की भाजप सरकार ही सर्वसामान्य जनतेसाठी नसून धनाढ्यांसाठी काम करते. जर या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे खा. पटेल यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित खा.मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.