शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:42 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सुकळीत भागवत सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, खा.मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, बंडूभाऊ सावरबांधे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, रामलाल चौधरी, विनोद पटोले, अविनाश वारजूरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, बशीर पटेल आदी उपस्थित होते.उपस्थितांच्या समोर खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जनतेला खोटे आश्वासन देवून केंद्रात व राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर दिलेल्या आश्वासनांचा भाजप सरकारला विसर पडला. आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण केले नाही.जनतेची घोर निराशा केली. लोकांमध्ये सरकारविरोधात जनआक्रोश होता. हे नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आला. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुखी नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. सरकारने जे आश्वासन दिले त्या आश्वासनांची आतापर्यंत पूर्तता करण्यात आली नाही.जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न कायम आहे. रोजगाराचा प्रश्न कायम आहे. दुधाला भाव नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. शेतकºयांमध्ये सरकारविरोधात रोष उफाळत आहे.लहान मोठ्या व्यवसायीकांचे तर कंबरडेच मोडले. जिल्ह्यातील स्थानिक नेते फक्त विकासाच्या गप्पा मारतात. प्रत्यक्ष कृती करीत नाही. शेतकऱ्यांसाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. या सरकारला घोषणा करण्याशिवाय काहीच दिसत नाही. जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. चार वर्षात एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नवीन रोजगार उपलब्ध करण्यात आलेला नाही. भेल प्रकल्पाचे काम सुरु करण्यास हे सरकार अपयशी ठरले. जनतेला कळून चुकले की भाजप सरकार ही सर्वसामान्य जनतेसाठी नसून धनाढ्यांसाठी काम करते. जर या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे खा. पटेल यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित खा.मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.