शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

कधी संपणार जगण्याचा संघर्ष?

By admin | Updated: November 8, 2014 22:32 IST

शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे.

जिल्ह्यात हजाराच्यावर भिकारी : महिला भिकाऱ्यांसाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्र नाहीभंडारा : शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे. भिकारी उदंड जाहले, पण प्रशासन थंडच राहिले, असे वास्तव सध्या समोर येऊ लागले आहेजखमेचे प्रदर्शन करणे किंवा लहान मुलांना समोर करून भीक मागणे हा गुन्हा आहे. असे असताना शहरातील अनेक भागात हा प्रकार सर्रास दिसून येतो. जिल्ह्यातील चौकाचौकात, रस्त्यांवर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, दवाखाने, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालय, मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भिकाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. एक रुपया दे दे बाबा.. भगवान तुम्हारी मांग पुरी करेगा.. अशा आर्जवांसह कधी आपले अपंगत्व दाखवत, तर कधी पदराआड लहान मुलांना पुढे करून शहरात जागोजागी भिकारी भीक मागताना दिसतात. पाचवीला पुजलेली गरिबी, दारिद्र्याचे जिणे व असह्य रोगांवरील उपचारासाठी भासणारी आर्थिक चणचण, यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. भिकाऱ्यांना अटक करा आणि भिक्षेकरी स्वीकार केंद्रत टाका, असे आदेश आहेत. मात्र शहरात आजही मोठ्या संख्येत भिकारी मोकळे आहेत.शासनातर्फे भिकाऱ्यायांसाठी भिक्षेकरी स्वीकार केंद्र चालविले जाते. विदर्भातील नागपूर येथे या एकमेव केंद्राची स्थापना १ एप्रिल १९७४ रोजी झाली. मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये या केंद्राची स्थापना करण्यात आली. राज्यात अशी एकूण १५ केंद्रे आहेत. मुंबई, पुणे, अहमदनगर, रायगड, सोलापूर या ठिकाणी ही केंद्र आहेत.पोलिसांनी विविध ठिकाणाहून पकडून आणलेल्या या भिकाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच इथे प्रवेश दिला जातो. शहरात भीक मागणे हा व्यवसाय झाला आहे. यामुळे भिकारी पकडला गेला तरीही त्याला तत्काळ सोडविले जाते. यामुळेच की काय पोलिसांकडून भिकारी पकडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र आहे. भिक्षेकरी स्वीकार केंद्रात पोलिसांनी पकडलेल्या व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या भिकाऱ्याला साधारण तीन महिन्यापर्यंत ठेवण्याचा नियम आहे. या कालावधीत त्याला जेवण कपडे, औषध या आवश्यक सुविधा मोफत पुरविल्या जातात. सोबतच स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात. यात शिवणकाम व कार्यालयीन फाईलचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु एवढे करूनही शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. भीक देण्याच्या प्रवृत्तीवर आळा घालाभाविनक पातळीवर जादा भीक पाडून घेण्यासाठी लहान मुलांना भाड्याने घेऊन त्यांचा वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यासाठी लहान मुलांचे अपहरण करून, त्यांना अपंग करून त्यांच्याकडून भीक मागविणाऱ्यांचेही मोठे रॅकेट राज्यात सक्रिय आहे.असे असताना दुसरीकडे भिकाऱ्यांकडे दयेच्या नजरेने पाहून त्यांच्या हातात दहाची नोट ठेवणारे शेकडो दयावान भिकाऱ्यांना रोज भेटतात. त्यामुळेच ही संख्या वाढतेय. भीक देण्याच्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. भीक देणे बंद झाल्यास याचा परिणाम भिकाऱ्यांच्या संख्येवर निश्चित दिसेल तसेच यातून फोफावत चालली गुन्हेगारीही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (नगर प्रतिनिधी)