शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कधी संपणार जगण्याचा संघर्ष?

By admin | Updated: November 8, 2014 22:32 IST

शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे.

जिल्ह्यात हजाराच्यावर भिकारी : महिला भिकाऱ्यांसाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्र नाहीभंडारा : शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे. भिकारी उदंड जाहले, पण प्रशासन थंडच राहिले, असे वास्तव सध्या समोर येऊ लागले आहेजखमेचे प्रदर्शन करणे किंवा लहान मुलांना समोर करून भीक मागणे हा गुन्हा आहे. असे असताना शहरातील अनेक भागात हा प्रकार सर्रास दिसून येतो. जिल्ह्यातील चौकाचौकात, रस्त्यांवर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, दवाखाने, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालय, मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भिकाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. एक रुपया दे दे बाबा.. भगवान तुम्हारी मांग पुरी करेगा.. अशा आर्जवांसह कधी आपले अपंगत्व दाखवत, तर कधी पदराआड लहान मुलांना पुढे करून शहरात जागोजागी भिकारी भीक मागताना दिसतात. पाचवीला पुजलेली गरिबी, दारिद्र्याचे जिणे व असह्य रोगांवरील उपचारासाठी भासणारी आर्थिक चणचण, यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. भिकाऱ्यांना अटक करा आणि भिक्षेकरी स्वीकार केंद्रत टाका, असे आदेश आहेत. मात्र शहरात आजही मोठ्या संख्येत भिकारी मोकळे आहेत.शासनातर्फे भिकाऱ्यायांसाठी भिक्षेकरी स्वीकार केंद्र चालविले जाते. विदर्भातील नागपूर येथे या एकमेव केंद्राची स्थापना १ एप्रिल १९७४ रोजी झाली. मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये या केंद्राची स्थापना करण्यात आली. राज्यात अशी एकूण १५ केंद्रे आहेत. मुंबई, पुणे, अहमदनगर, रायगड, सोलापूर या ठिकाणी ही केंद्र आहेत.पोलिसांनी विविध ठिकाणाहून पकडून आणलेल्या या भिकाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच इथे प्रवेश दिला जातो. शहरात भीक मागणे हा व्यवसाय झाला आहे. यामुळे भिकारी पकडला गेला तरीही त्याला तत्काळ सोडविले जाते. यामुळेच की काय पोलिसांकडून भिकारी पकडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र आहे. भिक्षेकरी स्वीकार केंद्रात पोलिसांनी पकडलेल्या व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या भिकाऱ्याला साधारण तीन महिन्यापर्यंत ठेवण्याचा नियम आहे. या कालावधीत त्याला जेवण कपडे, औषध या आवश्यक सुविधा मोफत पुरविल्या जातात. सोबतच स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात. यात शिवणकाम व कार्यालयीन फाईलचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु एवढे करूनही शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. भीक देण्याच्या प्रवृत्तीवर आळा घालाभाविनक पातळीवर जादा भीक पाडून घेण्यासाठी लहान मुलांना भाड्याने घेऊन त्यांचा वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यासाठी लहान मुलांचे अपहरण करून, त्यांना अपंग करून त्यांच्याकडून भीक मागविणाऱ्यांचेही मोठे रॅकेट राज्यात सक्रिय आहे.असे असताना दुसरीकडे भिकाऱ्यांकडे दयेच्या नजरेने पाहून त्यांच्या हातात दहाची नोट ठेवणारे शेकडो दयावान भिकाऱ्यांना रोज भेटतात. त्यामुळेच ही संख्या वाढतेय. भीक देण्याच्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. भीक देणे बंद झाल्यास याचा परिणाम भिकाऱ्यांच्या संख्येवर निश्चित दिसेल तसेच यातून फोफावत चालली गुन्हेगारीही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (नगर प्रतिनिधी)