शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कधी संपणार ‘रेफर टू भंडारा’चे ग्रहण?

By admin | Updated: December 24, 2014 22:55 IST

तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो.

राजू बांते/सिराज शेख - मोहाडीतालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो. याशिवाय वैद्यकीय चाचणीसाठी डॉक्टर नसल्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागते. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज बळावली आहे.मोहाडी तालुक्यात मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालय हाच एकमेव मोठा दवाखाना आहे. तालुक्यातील ७० हजार गरीब व सामान्य परिवारातील नागरिक या रुग्णालयावर आश्रीत आहेत. तालुक्यात पाच वर्षापासून ते ८० ते ९० वर्षापर्यंतचे दोन लाख नागरिक आहेत. त्यापैकी ७० ते ८० हजार नागरिकांचा थेट संबंध मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाशी येतो. मोहाडी ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचा अत्याधुनिक पद्धतीचा आहे. मात्र या रुग्णालयात मागील आठ वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकेच्या दोन जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एक जागा व सफाई कर्मचाऱ्याची एक जागा रिक्त आहे. अनेक दिवसापासून एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या तीन जागा रिक्त आहेत. सध्या या रुग्णालयात केवळ एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर असून त्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे दररोज बाहेरुन येणाऱ्या रुग्णांना एक होमीओपॅथी डॉक्टराकडून तपासून घ्यावे लागते. या रुग्णालयात आधुनिक प्रकारचे शस्त्रक्रिया कक्ष आहे. मात्र प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हा शस्त्रक्रिया कक्ष असून नसल्यासारखा विनाकामाचा ठरत आहे. या कक्षाचा उपयोग कधी कधी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी केले जाते. डॉक्टरांच्या रिक्त जागेमुळे येथे प्रसुतीसुद्धा करण्यात येत नाही. या ग्रामीण रुग्णालयात नेहमी ‘रेफर टू भंडारा’ हेच वाक्य रुग्णांच्या कानी पडते. ग्रामीण भागातून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आलेल्या रुग्णांना व गरोदर महिलेला पुन्हा भंडाऱ्याच्या रुग्णालयात पाठविण्यात येत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे रुग्णालयाचा संपूर्ण कारभार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पूर्वी येथे चार डॉक्टर होते. मात्र आता फक्त एकच होमीयोपॅथी डॉक्टर सोनवाने आहेत आणि त्यांनाच दररोज संपूर्ण रुग्णांची तपासणी करावी लागते. या रुग्णालयात दररोज १५० ते २०० रुग्ण विविध आजारासंबंधाने येतात. मात्र एकच डॉक्टर असल्याने काहींना तसेच परत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.