शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अखेर त्या जीर्ण विद्युत खांबाच्या ठिकाणी लागले नवीन खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

अड्याळ : जीर्ण विद्युत खांब धोकादायक असल्याचे तथा विद्युत खांब बांधून ठेवले जांबाच्या झाडाला, या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त ...

अड्याळ : जीर्ण विद्युत खांब धोकादायक असल्याचे तथा विद्युत खांब बांधून ठेवले जांबाच्या झाडाला, या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, विद्युत विभागाला उशिरा का होईना; पण जाग आली. अड्याळ येथील जामा मस्जीदजवळील जीर्ण विद्युत खांबाच्या ठिकाणी मंगळवारी विद्युत उपकेंद्र अड्याळ येथील विद्युत अधिकारी तथा कर्मचारी यांनी त्या ठिकाणी नवीन विद्युत खांब उभा केला व विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला आहे; पण खेदाची बाब म्हणजे जामा मस्जीद ते आझाद वॉर्डपर्यंत तथा गावातील इतर ठिकाणचे जी विद्युत खांब जीर्ण झाली आहेत, ती अपघात झाल्यावरच बदलणार का, असाही संतप्त सवाल आज अड्याळ ग्रामवासी करताना दिसत आहेत.

तसेच गावात

काही विद्युत खांब एका बाजूला वळली आहेत, यावरही तत्काळ काम करणे आवश्यक आहे. गावातील विद्युत खांब प्राप्त माहितीनुसार, १९६० ते ७० च्या दशकात लावले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे आणि यापैकी काही विद्युत खांब डागडुजी केली आहेत, आता त्या ठिकाणीसुद्धा नवीन विद्युत खांब खबरदारी म्हणून लावल्याशिवाय पर्याय नाही, ही कामे वेळेच्या आधी, दुर्घटना होण्याची वाट न पाहता केले तर ठीक होणार नाहीतर अपघात निश्चितच होण्याची दाट शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे.

जामा मस्जीदजवळून ते आझाद वॉर्डपर्यंत तथा गावातील अन्य ठिकाणी जीर्ण झालेले तथा ग्रामस्थांच्या घरावरून विद्युत तार गेली आहेत तर काही ग्रामस्थांनी त्यावर उपाय म्हणून आपल्याच घराला धोका होऊ नये म्हणून त्या जिवंत विद्युत तारांना लाकडी टेकणी लावल्याचे गावात ठिकठिकाणी पाहायला मिळणार तर काही ठिकाणी झाडांना स्पर्श करून तारे गेलेली आहेत, याला म्हणायचे काय, हेच कुणाला कळत नाही; त्यामुळे आता तरी विद्युत उपकेंद्र अड्याळ यांनी गावातील गल्लोगल्लीत जाऊन सर्व्हे करून कुठे काय प्रॉब्लेम आहेत, कुठले विद्युत खांब जीर्ण आहेत, याचा पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.

ज्या ठिकाणी विद्युत खांब नवीन बसविण्यात आले आहे आता ज्या-ज्या ठिकाणचे जीर्ण झालेले विद्युत खांब, एका बाजूला झुकलेले, ग्रामस्थांच्या घरावर आलेली विद्युत तार, झाडाला स्पर्श करत गेलेली विद्युत तार यावर विद्युत उपकेंद्र कोणती भूमिका घेणार, याकडेही समस्त ग्रामवासीयांचे लक्ष लागून आहे.