शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. परीक्षार्थीना आता सहा संधी ...

भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. परीक्षार्थीना आता सहा संधी मिळणार असून मागास प्रवर्गांसाठी नऊ संधी राहणार आहेत. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. परंतु या निर्णयाबाबत स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीला सहा, मागास प्रवर्गातील परीक्षार्थीला नऊ तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वयाच्या २१ व्या वर्षीपासून परीक्षा देता येतात आणि फक्त वयाची अट नसल्याने विद्यार्थी केवळ परीक्षा देत बसतात. परीक्षा देण्यासाठी आलेल्या अटीमुळे आता नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल. अगोदर जुने विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करीत असल्यामुळे मुख्य परीक्षेस पात्र होत पण आता ते बाद झाल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल.

अशाप्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिशा मिळेल

एमपीएससीने परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच दिशा मिळून एका वर्षात होणाऱ्या तीन ते चार परीक्षा न देता एकाच पदासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच पदासाठी अधिकारी म्हणून संधी मिळेल.

- सुजाता रामटेके, उमेदवार

जागा निघतीलच याची शाश्वती काय?

ज्यांनी आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली आहे त्यांना मात्र आता एमपीएससीने घेतलेला निर्णय उमेदवाराच्या दृष्टीने १०० टक्के नकारात्मक आहे. कारण दरवर्षी जात प्रवर्गानिहाय निघणाऱ्या जागा कमी-जास्त होतात. दरवेळी आपल्या प्रवर्गाच्या जागा निघतील याची शाश्वती नाही.

-अमित वासनिक, उमेदवार

सर्वांना समान संधी हवी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बी प्लॅनचे नियोजन व्यवस्थित करता येईल. पण यामध्ये सर्वांनाच समान संधी द्यायला हवी होती. कारण निवड प्रक्रिया करताना निवड ही आरक्षणाच्या धर्तीवरच होणार आहे.

-हीना भगत, उमेदवार

वेळेवरच सर्व प्रक्रिया पार पाडावी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच एमपीएससीनेही परीक्षेच्या संधी मर्यादित करणारा निर्णय घेतला आहे. काही बाबतीत तो चांगला असला तरी त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची वेळेवर प्रक्रिया पार पाडावी लागेल

-हर्षलता नंदेश्वर, उमेदवार