शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. परीक्षार्थीना आता सहा संधी ...

भंडारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. परीक्षार्थीना आता सहा संधी मिळणार असून मागास प्रवर्गांसाठी नऊ संधी राहणार आहेत. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. परंतु या निर्णयाबाबत स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीला सहा, मागास प्रवर्गातील परीक्षार्थीला नऊ तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वयाच्या २१ व्या वर्षीपासून परीक्षा देता येतात आणि फक्त वयाची अट नसल्याने विद्यार्थी केवळ परीक्षा देत बसतात. परीक्षा देण्यासाठी आलेल्या अटीमुळे आता नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल. अगोदर जुने विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करीत असल्यामुळे मुख्य परीक्षेस पात्र होत पण आता ते बाद झाल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल.

अशाप्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिशा मिळेल

एमपीएससीने परीक्षा देण्याच्या संधीची कमाल मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय योग्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच दिशा मिळून एका वर्षात होणाऱ्या तीन ते चार परीक्षा न देता एकाच पदासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच पदासाठी अधिकारी म्हणून संधी मिळेल.

- सुजाता रामटेके, उमेदवार

जागा निघतीलच याची शाश्वती काय?

ज्यांनी आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली आहे त्यांना मात्र आता एमपीएससीने घेतलेला निर्णय उमेदवाराच्या दृष्टीने १०० टक्के नकारात्मक आहे. कारण दरवर्षी जात प्रवर्गानिहाय निघणाऱ्या जागा कमी-जास्त होतात. दरवेळी आपल्या प्रवर्गाच्या जागा निघतील याची शाश्वती नाही.

-अमित वासनिक, उमेदवार

सर्वांना समान संधी हवी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बी प्लॅनचे नियोजन व्यवस्थित करता येईल. पण यामध्ये सर्वांनाच समान संधी द्यायला हवी होती. कारण निवड प्रक्रिया करताना निवड ही आरक्षणाच्या धर्तीवरच होणार आहे.

-हीना भगत, उमेदवार

वेळेवरच सर्व प्रक्रिया पार पाडावी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच एमपीएससीनेही परीक्षेच्या संधी मर्यादित करणारा निर्णय घेतला आहे. काही बाबतीत तो चांगला असला तरी त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची वेळेवर प्रक्रिया पार पाडावी लागेल

-हर्षलता नंदेश्वर, उमेदवार