शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टीसी नसेल तरी मिळेल विद्यालयात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

मोहाडी : दहावीपर्यंत कोणत्याही शाळेत आता टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) नसल्यावर वयाचा दाखला बघून प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे ...

मोहाडी : दहावीपर्यंत कोणत्याही शाळेत आता टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) नसल्यावर वयाचा दाखला बघून प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे टीसी मिळविण्यात अडचण आलेल्या किंवा टीसी नसलेल्या विद्यार्थ्यांना सरळ वयानुसार दहावीपर्यंतच्या कोणत्याही वर्गात प्रवेश मिळणार आहे.

पूर्वी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी टीसीची आवश्यकता होती. एखादा मुलगा अथवा मुलगी विपरीत परिस्थतीमुळे खासगी शाळेची फी भरू शकला नाही किंवा इतर काही कारणांमुळे त्याला टीसी प्राप्त करण्यात अडचण आल्यास त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत टीसीअभावी सरळ प्रवेश मिळत नव्हता. तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होता. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हा कायदा येऊन जरी १२ वर्षे लोटले असले तरी पूर्णपणे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढून सर्व विद्यालयांना टीसी नसतानाही त्याच्या जन्मदाखल्याच्या वयोमानानुसार त्या विद्यार्थ्याला कोणत्या इयत्तेत प्रवेश देता येईल हे निश्चित करून प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.

३१ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की आरटीई अधिनियमातील कलम-४ अन्वये शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. कलम १४(१) नुसार वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख त्या कायद्यात आहे. तरी अनेक शाळा टीसी नसल्यावर प्रवेश नाकारत होते. त्या विद्यार्थ्यांचे ते शैक्षणिक वर्ष वाया जात होते. त्यामुळे शासनाने पुन्हा आदेश काढून राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत एखादा विद्यार्थी प्रवेश मागत असेल तर प्रवेश नाकारू नये व या बाबतीत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्याला तात्पुरता प्रवेश देऊन पुढील आवश्यक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहे.

बॉक्स

मुख्याध्यापकासह शाळेवरही होणार कारवाई

प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापकावर, शाळेवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे या आदेशात नमूद आहे, त्यामुळे टीसी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात आता अडचण येणार नाही. यामुळे आता टीसी उपलब्ध नसल्यावरही कोणताही विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो.