शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा काळातही एसटी बस नाहीच, पालकांनाच सोडावे लागेल केंद्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

भंडारा विभागातील एसटी कर्मचारी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपावर आहे. संप कधी मिटणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने काही कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर बसेस सुरू केल्या. परंतु त्या सर्व शहरी भागात आहे. आता ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी एसटी बसने परीक्षा केंद्रावर जातात. परंतु यावर्षी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने दिलासा मिळत असला तरी एसटीच्या संपाने दहावी, बारावीत असलेले विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेस नसल्याने पालकांनाच आपल्या मुलांना केंद्रावर सोडून द्यावे लागणार आहे.भंडारा विभागातील एसटी कर्मचारी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपावर आहे. संप कधी मिटणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने काही कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर बसेस सुरू केल्या. परंतु त्या सर्व शहरी भागात आहे. आता ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी एसटी बसने परीक्षा केंद्रावर जातात. परंतु यावर्षी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना सोबतच घेवून दुचाकी अथवा खासगी वाहनाने जावे लागेल.

बारावीची परीक्षा ४ मार्च - जिल्ह्यात बारावीचे १६३ केंद्र असून येथे १७२ शाळातील १८ हजार १०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने जैय्यत तयारी केली आहे.- कोरोना संसर्गाचे सावट असल्याने परीक्षा केंद्र संबंधित शाळांमध्येच देण्यात आले आहे. याठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी उत्सुक असून ऑफलाईन परीक्षा होणार आहे.

दहावीची परीक्षा १५ मार्च- जिल्ह्यात दहावीचे २६९ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले. त्यात मुख्य केंद्र ८२ तर उपकेंद्र १८१ आहे. येथे २८८ शाळातील १७ हजार २० विद्यार्थी परीक्षा देतील.- दहावीची परीक्षा महत्वाची मानली जाते. मात्र कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यात आता एसटी बसचा संप असल्याने केंद्रापर्यंत पोहचण्याचे दिव्य विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पार पाडावे लागेल.

एसटीची संख्या किती वाढणार?जिल्ह्यात सध्या प्रमुख मार्गावर बससेवा सुरू आहे. संपकाळात १५२ कंत्राटी चालकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १०० चालकांची मंजुरी मध्यवर्ती कार्यालयाकडून मिळाली आहे. प्रमुख बसस्थानकांवर व गर्दीच्या ठिकाणी बुकींगसाठी कर्मचारी नियुक्तीबाबत ट्रॅयमॅक्स कंपनीला कळविण्यात आले आहे. मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच बसेसची संख्या वाढेल.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप