शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही बावनथडी प्रकल्प निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:38 IST

पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देमृतसाठा ७.५ टक्के : पावसाचा दगा, शेतकऱ्यांचा आशा मावळल्या

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील सीतेकसा गावाजवळ बावनथडी नदीवर राजीव सागर प्रकल्प उभारण्यात आला. ३५ वर्षापुर्वी या प्रकल्पावर दोनही राज्यांनी एक हजार ८३८ कोटी रूपये खर्च केले. त्यात महाराष्ट्राचा वाटा ८३६ कोटी आहे. दोन्ही राज्यांनी आपापल्या क्षेत्रात कालवे, वितरेकीची कामे पूर्ण केली. शेतकºयांकडून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. या प्रकल्पात अनेक विघ्न आले. परंतु शेवटी हा प्रकल्प पुर्णत्वास आला. तुमसर तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान आहे. परंतु यंदा या प्रकल्पाचा जलसाठा निरंक आहे.दीड महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ झाला. परंतु पावसाने दडी मारली. त्यामुळे बावनथडी नदी अद्यापही कोरडी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास रबी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण जाणार आहे. शेतकºयांसोबत सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा असून कधी एकदा वरुण राजा बरसतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग नाहीबावनथडी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्के आहे. नियमानुसार मृत साठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. त्यामुळे आस्मानी संकटाचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. या धरणाकडून शेतकºयांना मोठी आशा होती. परंतु अपुºया पावसामुळे आशा मावळली आहे.पावसाची रिमझिमगत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. परंतु पाऊस रिमझिम कोसळत आहे. पावसाला जोर नाही. केवळ वातावरणात गारवा निर्माण झाला. यंदा जिल्ह्यावर निसर्ग कोपला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस नाही. मध्यप्रदेशातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे सारे हतबल दिसत आहे.बावनथडी प्रकल्पात सध्या उपयुक्त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्के आहे. मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. धरण क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे.-आर. आर. बडोले,उपविभागीय अभियंता, तुमसर