शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

अडीच दशकानंतरही पौना ग्रामस्थांची हाक प्रशासनापर्यंत पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वाढीव गावठाणाची मागणी शासन प्रशासनाकडे केली होती.

ठळक मुद्देसमस्यांचा अंबार : जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणार ग्रामस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील वैनगंगा काठावर वसलेल्या पौना (खुर्द) ग्रामवासी जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत. अडीच दशकानंतरही ग्रामवासी यांची वाढीव गावठाणाची हाक प्रशासनाच्या कानी पडत नाही.आसगाव येथे सरपंचाच्या उपस्थित पत्रपरिषद घेवून ग्रामवासीयांनी गावठाणाची जागा न मिळाल्यास आंदोलनाच इशारा देॅन घेवून शासनाला निवेदन पाठविले आहे.वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वाढीव गावठाणाची मागणी शासन प्रशासनाकडे केली होती. शासनाने याची दखल घेत सन २००९ मध्ये गावाची पाहणी करून गट क्रमांक ८७, ८८, ८९ व ९९ आराजी अनुक्रमे ४.४२ हेक्टर आर जागेची मोजणी केली. मात्र त्यावर कोणताच निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नाही. फाईल बंद करून उपविभागीय कार्यालय भंडारा येथे धूळ खात पडून आहे.ग्रामवासीयांनी अधिकाºयांना अनेक वेळा विचारणा केली असता अधिकाºयांकडून उलटसुलट उत्तरे देवून गावकºयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. २५ वर्षापासून पौनाखुर्दवासीयांना शासन प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने गावकरी पुरत वैतागले आहेत. नदीला नेहमी येत असलेले पुराचे पाणी गावात शिरून गावाला बेटाचे रूप प्राप्त होत असून सरपडणाºया प्राण्यांपासून ग्रामस्थांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यातच वैनगंगेला आलेल्या पुरामुळे नदीपात्राची रूंदी दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या नदीपात्रामुळे एक दिवस संपूर्ण गावच नदीपात्रात गिळंकृत होण्याची भिती नाकारता येत नाही. वैनगंगेच्या पाण्यामुळे गाव परिसरातील भागात दलदल निर्माण झाले असून नवनिर्माण बांधकाम करणे अशक्य झाले आहे. गावकºयांपुढे एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रशासनाने अद्याप कोणताच निर्णय गावकºयांच्या बाजुने घेतला नसल्यामुळे २५ वर्षापासून वाढीव गावठाणाची जागा मिळविण्यासाठी समस्त पौनाखुर्द ग्रामवासीयांनी आसगाव ग्रामपंचायतमध्ये पत्र परिषद घेवून वाढीव गावठाणाची जागा देण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच चंद्रकला व्यंकट बावनकर, उपसरपंच शरद पडोळे, भाष्कर नंदूरकर, प्रफुल वालदेकर, दिवाकर वैद्ये, इंदूरकर, माजी उपसरपंच मोहन कुर्झेकर, नेपाल गभणे आदी ग्रामवासी उपस्थित होते.