शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

अडीच दशकानंतरही पौना ग्रामस्थांची हाक प्रशासनापर्यंत पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वाढीव गावठाणाची मागणी शासन प्रशासनाकडे केली होती.

ठळक मुद्देसमस्यांचा अंबार : जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणार ग्रामस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील वैनगंगा काठावर वसलेल्या पौना (खुर्द) ग्रामवासी जीव धोक्यात घालून जीवन जगत आहेत. अडीच दशकानंतरही ग्रामवासी यांची वाढीव गावठाणाची हाक प्रशासनाच्या कानी पडत नाही.आसगाव येथे सरपंचाच्या उपस्थित पत्रपरिषद घेवून ग्रामवासीयांनी गावठाणाची जागा न मिळाल्यास आंदोलनाच इशारा देॅन घेवून शासनाला निवेदन पाठविले आहे.वैनगंगा नदीकाठावर बसलेल्या पौना खुर्द गावाला सन १९९४ मध्ये आलेल्या पुरामुहे गावात पाणी शिरून अनेक घराची पडझड झाली होती. पुराच्या भितीमुळे अनेक ग्रामस्थानी पलायन केले होते. तर त्यावेळी ग्रामस्थान आसगाव येथे स्थलांतरीत केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन वाढीव गावठाणाची मागणी शासन प्रशासनाकडे केली होती. शासनाने याची दखल घेत सन २००९ मध्ये गावाची पाहणी करून गट क्रमांक ८७, ८८, ८९ व ९९ आराजी अनुक्रमे ४.४२ हेक्टर आर जागेची मोजणी केली. मात्र त्यावर कोणताच निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नाही. फाईल बंद करून उपविभागीय कार्यालय भंडारा येथे धूळ खात पडून आहे.ग्रामवासीयांनी अधिकाºयांना अनेक वेळा विचारणा केली असता अधिकाºयांकडून उलटसुलट उत्तरे देवून गावकºयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. २५ वर्षापासून पौनाखुर्दवासीयांना शासन प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने गावकरी पुरत वैतागले आहेत. नदीला नेहमी येत असलेले पुराचे पाणी गावात शिरून गावाला बेटाचे रूप प्राप्त होत असून सरपडणाºया प्राण्यांपासून ग्रामस्थांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यातच वैनगंगेला आलेल्या पुरामुळे नदीपात्राची रूंदी दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या नदीपात्रामुळे एक दिवस संपूर्ण गावच नदीपात्रात गिळंकृत होण्याची भिती नाकारता येत नाही. वैनगंगेच्या पाण्यामुळे गाव परिसरातील भागात दलदल निर्माण झाले असून नवनिर्माण बांधकाम करणे अशक्य झाले आहे. गावकºयांपुढे एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रशासनाने अद्याप कोणताच निर्णय गावकºयांच्या बाजुने घेतला नसल्यामुळे २५ वर्षापासून वाढीव गावठाणाची जागा मिळविण्यासाठी समस्त पौनाखुर्द ग्रामवासीयांनी आसगाव ग्रामपंचायतमध्ये पत्र परिषद घेवून वाढीव गावठाणाची जागा देण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच चंद्रकला व्यंकट बावनकर, उपसरपंच शरद पडोळे, भाष्कर नंदूरकर, प्रफुल वालदेकर, दिवाकर वैद्ये, इंदूरकर, माजी उपसरपंच मोहन कुर्झेकर, नेपाल गभणे आदी ग्रामवासी उपस्थित होते.