शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

पावसाळा लागूनही मामा तलाव दुरूस्ती ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:24 IST

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील मामा तलाव विशेष दुरूस्तीला सन २०१५-१६ मध्ये मंजुरी मिळाली.

रेेंगेपारवासीयांचा आरोप : आवश्यकता नसतानाही अंदाजपत्रकात केली तरतूदलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील मामा तलाव विशेष दुरूस्तीला सन २०१५-१६ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटत असतानाही काम ठप्प असल्याचा आरोप रेंगेपार कोहळीवासीयांनी केला आहे.पाणीवाटप समितीचे सचिव विनायक मुंगमोडे यांनी याबाबत लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, शाखा अभियंता लाखनी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात मुंगमोडे यांनी आरोप लावताना रेंगेपार (कोहळी) येथील मामा तलाव दुरूस्तीला लघु पाटबंधारे विभागाने सन २०१५-१६ मध्ये विशेष दुरूस्ती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. सदर कामाची ई निविदा मागवून काम वाटप करण्यात आले आहे. यानंतरही आजतागायत सदर काम करण्यात आले नसल्याचा आरोप मुंगमोडे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.राज्य शासनाने जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार, संकल्पना राबविली आहे. यातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी हा मुख्य उद्देश. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील मामा तलावाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिके वाचविण्यासाठी पाणी मिळणार नसल्याने अडचण निर्माण होणार आहे.मामा तलाव विशेष दुरूस्तीसाठी बनविण्यात आलेल्या अंदाजपत्रकातही दोष आहे. तलावाचे वेष्ट वेअर मोठ्या प्रमाणात फुटलेला असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने पिके पाण्याअभावी करपतात. यासोबतच नहराला फुटवेअरची गरज असतानासुद्धा अंदाजपत्रकात फुटवेअरची तरतूद केली नाही. तलावाचे पाणी शेत पिकविण्याकरीता वाटप करताना शेतात न जाता नहराच्या फुटलेल्या भागातून पाणी नाल्याला मिळते. त्यामुळे फुटवेअरची तरतुद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तलावाच्या नहर दुरूस्तीच्या कामाकरीता कसल्याही प्रकारची व्हीआरडी गरज नसतानाही अंदाजपत्रकात तीन व्हीआरबीचा समावेश केलेला आहे. तसेच चार आऊटलेटची गरज असताना १२ आऊटलेट अंदाजपत्रकात समाविष्ठ केल्या असल्याची बाबही समोर आली आहे. सदर अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या कामांचा समावेश करून निधीचा दुरूपयोग न करता तातडीने काम पुर्ण करावे, अशी मागणी रेंगेपारवासीयांनी केली आहे. याबाबत त्यांनी १० जूनला आमसभा घेऊन त्यात हा निर्णय घेतला आहे.