शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ऐंशीनंतरही ज्येष्ठांचा आत्मविश्वास दांडगा; ३०८ वृद्धांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

भंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले, मात्र जगण्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास दांडगा करीत जिल्ह्यातील ३०८ वृद्धांनी कोरोनावर ...

भंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले, मात्र जगण्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास दांडगा करीत जिल्ह्यातील ३०८ वृद्धांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. इतरांनाही याबाबत ते प्रेरणा देत आहेत.

भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटेत २०२ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. यावेळी २१ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८० वर्षांवरील एकूण ३२ वृद्धांचा मृत्यू झाल्या. परंतु अन्य ३०८ वयोवृद्धांनी जगण्याची उमेद सोडली नाही. प्रचंड इच्छाशक्ती व दांडगा आत्मविश्वास जोपासत त्यांनी कोरोनाला हरविले. ६० ते ७० या वयोगटातील ३०६ वयोवृद्ध दुसरा लाटेत मृत्युमुखी पडले तसेच ७१ ते ७९ या वयोगटातील १२२ ज्येष्ठ कोरोनामुळे मृत पावले आहेत.

४० ते ६० या वयोगटात सर्वाधिक मृत्यू

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली. ४० ते ६० या वयोगटातील नागरिक सर्वाधिक मृत्युमुखी पडले. ४० ते ५० या वयोगटातील १७५ व्यक्ती दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावले तसेच ५१ ते ६० या वयोगटातील ३०४ व्यक्ती कोरोनाच्या लढाईत हरले. पहिला लाटेत ४१ ते ५० या वयोगटातील ४८, तर ५१ ते ६० या वयोगटातील एकूण ८९ नागरिक कोरोनामुळे मृत पावले होते.

बॉक्‍स

आम्हाला कुणीच हरवू शकत नाही

मनुष्याने एकदा मनात आत्मविश्वास निर्माण केला व जिंकण्याची जिद्द सोडली नाही तर तो शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. कोरोनाच्या बाबतीतही हेच झाले. मी हिंमत हारली नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आप्तस्वकीय यांच्याशी बोलत होतो, नातवंडांची हालचाल विचारत होतो. अशात मन गमत गेले. कोरोनावर आपण हमखासपणे मात करू शकतो.

- नारायण खेडीकर, एकोडी, ता. साकोली

बॉक्स

दोन महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला होता. मात्र मी हिंमत सोडली नाही. आरोग्य विभागामार्फत मिळालेली औषधे नियमित वेळेत सेवन केली. कोरोना ब्लॉकमध्ये असतानाही काही अस्वस्थ वाटायचे. मात्र मनाने कधीही खचून गेलो नाही. १४ दिवसांनंतर सुटी झाल्यावर एक वेगळा अनुभव मी प्राप्त केला. माणसाने कधीही जगण्याची उमेद सोडू नये.

बाबूराव वासनिक, ज्येष्ठ नागरिक, भंडारा