शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तक्रार देऊनही रेतीचोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:33 IST

तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देतामसवाडीतील प्रकार : अपघाताच्या संभाव्य धोक्यामुळे झाल्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.शहरालगत वैनगंगेची विस्तीर्ण असे पात्र असून अनेक रेती घाटातून पांढरीशुभ्र रेती निघते. या घाटांच्या लिलावामध्ये स्थगनादेश मिळाला आहे. परिणाम अवैधरित्या रेतीचा उपसा करून तो विकण्याचा सपाटा तालुक्यात रेती चोरांनी लगावला आहे. रेती घाटातून पोकलँड मशिनने रेतीचा उपसा होत आहे.खड्यात पाणी साचले असल्यामुळे पादचारी व दुचाकी धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात उन्हाळी सुट्यानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने शाळेत जावे लागत असताना अवैध रेती वाहतुक करणारे ट्रक सुसाट वेगाने रोडवरून् धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातून होणारी अवैध रेती तस्करी बंद व्हावी या साठी तामवासवाडी, बाम्हणीसह सितेपार व परिसरातील नागरिकांनी महसूल विभागात तक्रारी केल्या. परंतू अजुनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिक संतापले आहेत.रेती चोर किंवा तस्कर हे विशिष्ट पक्षाशी सल्याशी असून निडणूक किंवा आदी कार्यक्रमात आर्थिक मदत पुरवित असल्याने लोकप्रतिनिधींचे त्यांना राजाश्रय मिळत असल्याने कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाºयाचा पोन खणखणल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रेती चोरांशी सुयोग्य असे अर्थकारण जुळवून घेतलेले आहे. परिणामी तक्रार होवूनही तामसवाडी, बम्हणी येथून रेती चोरी सुरूच आहे. या अर्थकारणामुळे भविष्यात किती बालकांना आपले जीव अपघातात गमवावे लागार हे येणारा काळच सांगेल. या अवैध वाहतुकीचे या अगोदरही जिल्ह्यात बळी गेलेले आहेत हे मात्र विशेष.रेती खननामुळे नदीपात्र धोक्यातपावसामुळे तालुक्यातील तामसवाडी व बाम्हणी रेती घाटातून अवैधरित्या नदीत पोकलँड मशिनने रेतीचा उपसा करून नदी किनाऱ्याजवळ तिची साठवणूक करून रात्री अपरात्रीला तर सोडाच दिवसा ढवळ्या विक्री केली जात आहे. आधीच गावातून जड वाहन जात असल्याने रत्याने पुर्णत: चालणे कठीण झाले आहे. तसेच नदी पात्रातून रेतीची पोकलॅण्डद्वारे खनन केले जात असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे.