शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तक्रार देऊनही रेतीचोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:33 IST

तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देतामसवाडीतील प्रकार : अपघाताच्या संभाव्य धोक्यामुळे झाल्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे.शहरालगत वैनगंगेची विस्तीर्ण असे पात्र असून अनेक रेती घाटातून पांढरीशुभ्र रेती निघते. या घाटांच्या लिलावामध्ये स्थगनादेश मिळाला आहे. परिणाम अवैधरित्या रेतीचा उपसा करून तो विकण्याचा सपाटा तालुक्यात रेती चोरांनी लगावला आहे. रेती घाटातून पोकलँड मशिनने रेतीचा उपसा होत आहे.खड्यात पाणी साचले असल्यामुळे पादचारी व दुचाकी धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात उन्हाळी सुट्यानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पायी अथवा सायकलने शाळेत जावे लागत असताना अवैध रेती वाहतुक करणारे ट्रक सुसाट वेगाने रोडवरून् धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातून होणारी अवैध रेती तस्करी बंद व्हावी या साठी तामवासवाडी, बाम्हणीसह सितेपार व परिसरातील नागरिकांनी महसूल विभागात तक्रारी केल्या. परंतू अजुनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिक संतापले आहेत.रेती चोर किंवा तस्कर हे विशिष्ट पक्षाशी सल्याशी असून निडणूक किंवा आदी कार्यक्रमात आर्थिक मदत पुरवित असल्याने लोकप्रतिनिधींचे त्यांना राजाश्रय मिळत असल्याने कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाºयाचा पोन खणखणल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी रेती चोरांशी सुयोग्य असे अर्थकारण जुळवून घेतलेले आहे. परिणामी तक्रार होवूनही तामसवाडी, बम्हणी येथून रेती चोरी सुरूच आहे. या अर्थकारणामुळे भविष्यात किती बालकांना आपले जीव अपघातात गमवावे लागार हे येणारा काळच सांगेल. या अवैध वाहतुकीचे या अगोदरही जिल्ह्यात बळी गेलेले आहेत हे मात्र विशेष.रेती खननामुळे नदीपात्र धोक्यातपावसामुळे तालुक्यातील तामसवाडी व बाम्हणी रेती घाटातून अवैधरित्या नदीत पोकलँड मशिनने रेतीचा उपसा करून नदी किनाऱ्याजवळ तिची साठवणूक करून रात्री अपरात्रीला तर सोडाच दिवसा ढवळ्या विक्री केली जात आहे. आधीच गावातून जड वाहन जात असल्याने रत्याने पुर्णत: चालणे कठीण झाले आहे. तसेच नदी पात्रातून रेतीची पोकलॅण्डद्वारे खनन केले जात असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येत आहे.