शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अंदाज समिती आज करणार गोसेखुर्द, बावनथडीची पाहणी

By admin | Updated: September 8, 2015 00:26 IST

महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द आणि बावनथडी प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर उच्चाधिकार असलेली २९ सदस्यीय ‘अंदाज समिती’ मंगळवारला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

विदर्भ दौरा : शेतकऱ्यांना सिंचनाची प्रतीक्षाभंडारा : महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द आणि बावनथडी प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर उच्चाधिकार असलेली २९ सदस्यीय ‘अंदाज समिती’ मंगळवारला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती या दोन्ही प्रकल्पाचे सुक्ष्म निरीक्षण करुन राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. या समितीचे अध्यक्ष जालनाचे आमदार अर्जुन खोतकर हे असून या समितीत तुमसरचे आमदार चरण वाघमारे हे सदस्य आहेत. १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करुन या प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन गोसेखुर्दसाठी ७०० कोटी रुपये तर बावनथडीसाठी १२० कोटीचा निधी घोषित केला. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पांना भेट देऊन या योजना पूर्ण होण्यासाठी आणखी किती रुपयांची गरज आहे, याची पाहणी करण्यासाठी ‘अंदाज समिती’ला दौरा करण्याचे निर्देश दिले आहे. या समितीचा दौरा गोपनीय ठेवण्यात आला असून ही समिती ८ सप्टेंबर रोजी बावनथडी ता. तुमसर, गोसीखुर्द ता. पवनी, धापेवाडा ता.तिरोडा आणि ९ सप्टेंबर रोजी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)मार्चपर्यंत निधी मिळण्याची शक्यतातुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण झाला असला भूमी संपादनाचा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही . ११९ शेतकऱ्यांना भूमी संपादनासाठी ७२ कोटी रुपयांची गरज आहे. अपूर्ण कामांसाठी ११ कोटी आणि प्रस्तावित कामांसाठी ३७ कोटी असे एकूण १२० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्प आणि ‘स्पिल-वे’ पूर्ण झाला आहे. धरणात जलसाठा करण्यात येत आहे. परंतु बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन निधीअभावी रखडले आहे. या प्रकल्पाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ७०० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा निधी मार्चपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.अंदाज समितीची मी सदस्य असल्यामुळे या समितीला बावनथडीचा दौरा करण्याची विनंती केली होती. या दौऱ्यामुळे बावनथडी प्रकल्पाच्या कामाला वेग येईल. शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल. प्रलंबित कामांचा निपटारा होईल. पर्यायाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, यासाठी मी प्रयत्नशील आहे.- आ.चरण वाघमारे,सदस्य, अंदाज समिती.