शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिचाळ येथे अतिक्रमण निर्मूलन

By admin | Updated: February 3, 2017 00:42 IST

येथील गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्याशेजारील लोकांच्या अतिक्रमणाने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे.

मुख्य मार्गावरील दुकाने हटविली : ग्रामपंचायतीचा पुढाकार, जेसीबीद्वारे कारवाईचिचाळ : येथील गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्याशेजारील लोकांच्या अतिक्रमणाने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाच्या दोन पदरी रस्ता कामाला हिरवी झेंडी मिळाल्याने रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीने कुणाची ही हयगय न करता अतिक्रमण हटविण्यात आले. ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र गावातील काही गब्बर अतिक्रमण धारकांचे अतिक्रमणावर केव्हा जेसीबी चालणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.पवनी तालुक्यात क्र. २ ची मोठी ग्रामपंचायत म्हणून चिचाळ संबोधली जाते. गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर काही धनदांडग्यांची खताची दुकाने, पानटपऱ्या, किराणा दुकान, सायकल आदी दुकाने थाटल्याने नाली गिळंकृत झाली आहे. रस्त्यावर सांडपाणी वाहत असते. रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. गावात येणारी एस. टी. बस खड््यातील पाणी रस्त्यावरील पादचाऱ्यांवर उडल्याने अनेकदा एस.टी. चालकात खडाजंगी झाली आहे. त्यामुळे काही एस.टी. चालक ती बस गावाबाहेरुनच घेऊन निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.सन २००२ ते २००७ या कालखंडातील सरपंच मुनिश्वर काटेखाये यांनी अतिक्रमण धारकांना लगाम लावण्यासाठी दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम केले. मात्र ती नाली अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केल्याने नाली दिसेनासीच झाली आहे. मात्र अतिक्रमण धारकांच्या दबंगगीरीने रस्ताच गिळंकृत झाला. त्यामुळे एस.टी., ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हर यांचे नेहमीच तू-तू, मै-मै झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाला संपूर्ण प्रकार डोळ्यासमोर असूनही गाव नाते समोर येत असल्याने अतिक्रमण काढण्यास मागे पुढे पाहत आहेत. सरपंच उषा काटेखाये व ग्रामपचांयत सदस्यांनी कर्तव्याची जान ठेवून व कुणाचीही हयगय न करता तीन वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अतिक्रमण हटविलेल्या रस्त्यावर जिल्हा परिषदेंतर्गत दलीत वस्ती योजनेतून ७ लक्ष रुपयाचे दुतर्फा रस्त्याचे बांधकामाला प्रारंभ केला आहे. उर्वरित शिल्लक रस्ता येणाऱ्या निधीतून करण्यात येईल. ह्या रस्त्यामुळे अतिक्रमण वाढणार नाही असे सरपंच उषा काटेखाये ‘लोकमत’ला सांगितले. चिचाळ येथे पाथरी गावाचे पूनर्वसन झाल्याने येथे गावाच्या चारही बाजूला माळरान जागा व आबादी शिल्लक राहिलेली नाही. गावाबाहेरील स्मशानभूमी व दफनभुमित ढोरफोडीत एका इसमाचे अतिक्रमण हटविले. मात्र त्या अतिक्रमण धारकांनी पुन्हा ‘जैसे थे’ केल्याने पाळीव प्राण्यांना चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील चक्रधर स्वामी चौक, बाजार चौक, मेहरी बोडी स्मशान भुमी व ढोरफोडीत अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे व गाव विकासात्मक कामात सहकार्य करावे. अन्यथा सदर विषय ग्रामसभेत घेवून ते अतिक्रमण काढण्यास ग्रामस्थ गप्प बसणारनाही याची नोंद त्या अतिक्रमण धारकांनी घ्यावी, असे कळविले आहे.अतिक्रमण काढताना सरपंच उषा काटेखाये, उपसरपंच दिलीप रामटेके, मनोज वैरागडे, देवनाथ वैद्य, अल्का शास्त्रकार, प्रभावती खोब्रागडे, प्रमिला सुखदेवे, ग्राम विकास अधिकारी बावनकुळे, शेखर मेश्राम, भाऊदास हातेल, रामचंद्र काटेखाये, शामलाल रामटेके व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)