शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

चिचाळ येथे अतिक्रमण निर्मूलन

By admin | Updated: February 3, 2017 00:42 IST

येथील गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्याशेजारील लोकांच्या अतिक्रमणाने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे.

मुख्य मार्गावरील दुकाने हटविली : ग्रामपंचायतीचा पुढाकार, जेसीबीद्वारे कारवाईचिचाळ : येथील गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील रस्त्याशेजारील लोकांच्या अतिक्रमणाने वाहनाला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाच्या दोन पदरी रस्ता कामाला हिरवी झेंडी मिळाल्याने रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीने कुणाची ही हयगय न करता अतिक्रमण हटविण्यात आले. ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र गावातील काही गब्बर अतिक्रमण धारकांचे अतिक्रमणावर केव्हा जेसीबी चालणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.पवनी तालुक्यात क्र. २ ची मोठी ग्रामपंचायत म्हणून चिचाळ संबोधली जाते. गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर काही धनदांडग्यांची खताची दुकाने, पानटपऱ्या, किराणा दुकान, सायकल आदी दुकाने थाटल्याने नाली गिळंकृत झाली आहे. रस्त्यावर सांडपाणी वाहत असते. रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. गावात येणारी एस. टी. बस खड््यातील पाणी रस्त्यावरील पादचाऱ्यांवर उडल्याने अनेकदा एस.टी. चालकात खडाजंगी झाली आहे. त्यामुळे काही एस.टी. चालक ती बस गावाबाहेरुनच घेऊन निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.सन २००२ ते २००७ या कालखंडातील सरपंच मुनिश्वर काटेखाये यांनी अतिक्रमण धारकांना लगाम लावण्यासाठी दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम केले. मात्र ती नाली अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केल्याने नाली दिसेनासीच झाली आहे. मात्र अतिक्रमण धारकांच्या दबंगगीरीने रस्ताच गिळंकृत झाला. त्यामुळे एस.टी., ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हर यांचे नेहमीच तू-तू, मै-मै झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाला संपूर्ण प्रकार डोळ्यासमोर असूनही गाव नाते समोर येत असल्याने अतिक्रमण काढण्यास मागे पुढे पाहत आहेत. सरपंच उषा काटेखाये व ग्रामपचांयत सदस्यांनी कर्तव्याची जान ठेवून व कुणाचीही हयगय न करता तीन वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अतिक्रमण हटविलेल्या रस्त्यावर जिल्हा परिषदेंतर्गत दलीत वस्ती योजनेतून ७ लक्ष रुपयाचे दुतर्फा रस्त्याचे बांधकामाला प्रारंभ केला आहे. उर्वरित शिल्लक रस्ता येणाऱ्या निधीतून करण्यात येईल. ह्या रस्त्यामुळे अतिक्रमण वाढणार नाही असे सरपंच उषा काटेखाये ‘लोकमत’ला सांगितले. चिचाळ येथे पाथरी गावाचे पूनर्वसन झाल्याने येथे गावाच्या चारही बाजूला माळरान जागा व आबादी शिल्लक राहिलेली नाही. गावाबाहेरील स्मशानभूमी व दफनभुमित ढोरफोडीत एका इसमाचे अतिक्रमण हटविले. मात्र त्या अतिक्रमण धारकांनी पुन्हा ‘जैसे थे’ केल्याने पाळीव प्राण्यांना चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील चक्रधर स्वामी चौक, बाजार चौक, मेहरी बोडी स्मशान भुमी व ढोरफोडीत अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे व गाव विकासात्मक कामात सहकार्य करावे. अन्यथा सदर विषय ग्रामसभेत घेवून ते अतिक्रमण काढण्यास ग्रामस्थ गप्प बसणारनाही याची नोंद त्या अतिक्रमण धारकांनी घ्यावी, असे कळविले आहे.अतिक्रमण काढताना सरपंच उषा काटेखाये, उपसरपंच दिलीप रामटेके, मनोज वैरागडे, देवनाथ वैद्य, अल्का शास्त्रकार, प्रभावती खोब्रागडे, प्रमिला सुखदेवे, ग्राम विकास अधिकारी बावनकुळे, शेखर मेश्राम, भाऊदास हातेल, रामचंद्र काटेखाये, शामलाल रामटेके व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)