शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांची वीज कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:33 IST

गोंदिया : वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन बुधवारी (दि. २५) मुंबई येथे संघटनेचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत झालेल्या बैठकीत काहीच ...

गोंदिया : वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन बुधवारी (दि. २५) मुंबई येथे संघटनेचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत झालेल्या बैठकीत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, वीज वितरणच्या अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) येथील वीज कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सायंकाळी ६ वाजता गेट मीटिंग घेऊन आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर, आता वीज अभियंत्यांचे ६ सप्टेंबरपासूनचे आंदोलन कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपल्या जिवाची बाजी लावून वीज अभियंता काम करीत आहेत. असे असतानाही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी प्रशासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच आता स्टाफ सेटअप धोरणाच्या आड अभियंत्यांची ५०० हून अधिक पदे रिक्त ठेवण्याचा डाव साधला जात आहे. यामुळे वीज अभियंत्यांवर नोकरी जाण्याची पाळी आली असून, त्यांच्यात चांगलाच रोष व्याप्त आहे. दरम्यान, वीज अभियंत्यांच्या मागण्यांना घेऊन सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे पदाधिकारी व कंपनी संचालकांत बुधवारी (दि.२५) मुंबई येथे बैठक झाली. मात्र, बैठकीत संचालकांनी कोणत्याही प्रकारचे ठोस व लेखी स्वरूपात उत्तर दिले नाही. यामुळे ही चर्चा फिस्टकल्याने वीज अभियंत्यांनी गुरुवारी (दि.२६) कार्यालयाच्या प्रवेशद्वारात घेतलेल्या गेट मीटिंगमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात निदर्शने करून रोष व्यक्त केला. याप्रसंगी असोसिएशनचे सचिव खुशाल सोनी, प्रविभागीय सचिव प्रदीप मोहीतकर, आनंद जैन, अजित जीचकर, रितेश टांगले, विनोद मस्करे, विलास कोडेकर, प्रदीप राऊत उपस्थित होते.