शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

ऊर्जामंत्र्यांनी मागितली २४ तासांची मुदत

By admin | Updated: August 15, 2016 00:19 IST

तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत.

प्रकरण साकोली तालुक्यातील कृषीपंपांच्या भारनियमनाचे : १६ पासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होणारसाकोली : तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत. मात्र यावर तोडगा न निघाल्यामुळे आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व समस्या सांगितली. यावर उर्जामंत्र्यांनी २४ तासाची मुदत मागून दि. १६ ला यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. जोपर्यंत भारनियमन बंद होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून दि. १६ पासून वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.यंदा शेतीसाठी अपेक्षीत पाऊस पडला नाही तरीही शेतकऱ्यांनी जसे जमेल तसे शेती केली तर काही शेतकऱ्यांची रोवणी आताही शिल्लक आहे. परिणामी पावसाअभावी धानाला पाणी होऊ शकत नाही. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिर व बोअरवेल आहे अशा शेतकऱ्यांमुळे भारनियमनाचे संकट आहे. यावर्षी उन्हाळ्यापासून कृषीपंपाला फक्त आठ तासच वीज पुरवठा मिळत आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरत नाही. त्यामुळे धान जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे हे भारनियमन बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या चकरा मारीत आहेत. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आज सकाळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली व भारनियमनाचे विरोधात चर्चा करून भारनियमन बंद करा अशी मागणी केली. यावर उर्जामंत्री बावनकुळे यांनी या शेतकऱ्यांना २४ तासाची मुदत देवून दि. १६ ला नागपूर येथे खासदार नाना पटोले, आ.बाळा काशीवार, आ.चरण वाघमारे, आ.अ‍ॅड.अवसरे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलाविल आहे. या बैठकीत या भारनियमनावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.पूर्वनियोजित दि. १६ पासूनचा धरणे आंदोलनाचा पवित्रा मात्र कायम ठेवला आहे. उर्जामंत्र्यांशी चर्चा करताना अविनाश ब्राम्हणकर, अशोक कापगते, नंदू समरीत, मदन रामटेके, बाबू बनकर, सुरेशसिंह बघेल, शालीकराम आसटकर, अंताराम खोटेले, केवळराम लांजेवार, जागेश्वर कापगते, सुधीर गोबाडे, नामदेव टेंभुर्णे सुखदेव इलमकर, अशोक बोरकर, नेतराम गहाणे, वसंता लांजेवार,अनिल खोटेले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)