शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांनी मागितली २४ तासांची मुदत

By admin | Updated: August 15, 2016 00:19 IST

तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत.

प्रकरण साकोली तालुक्यातील कृषीपंपांच्या भारनियमनाचे : १६ पासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होणारसाकोली : तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत. मात्र यावर तोडगा न निघाल्यामुळे आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व समस्या सांगितली. यावर उर्जामंत्र्यांनी २४ तासाची मुदत मागून दि. १६ ला यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. जोपर्यंत भारनियमन बंद होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून दि. १६ पासून वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.यंदा शेतीसाठी अपेक्षीत पाऊस पडला नाही तरीही शेतकऱ्यांनी जसे जमेल तसे शेती केली तर काही शेतकऱ्यांची रोवणी आताही शिल्लक आहे. परिणामी पावसाअभावी धानाला पाणी होऊ शकत नाही. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिर व बोअरवेल आहे अशा शेतकऱ्यांमुळे भारनियमनाचे संकट आहे. यावर्षी उन्हाळ्यापासून कृषीपंपाला फक्त आठ तासच वीज पुरवठा मिळत आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरत नाही. त्यामुळे धान जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे हे भारनियमन बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या चकरा मारीत आहेत. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आज सकाळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली व भारनियमनाचे विरोधात चर्चा करून भारनियमन बंद करा अशी मागणी केली. यावर उर्जामंत्री बावनकुळे यांनी या शेतकऱ्यांना २४ तासाची मुदत देवून दि. १६ ला नागपूर येथे खासदार नाना पटोले, आ.बाळा काशीवार, आ.चरण वाघमारे, आ.अ‍ॅड.अवसरे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलाविल आहे. या बैठकीत या भारनियमनावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.पूर्वनियोजित दि. १६ पासूनचा धरणे आंदोलनाचा पवित्रा मात्र कायम ठेवला आहे. उर्जामंत्र्यांशी चर्चा करताना अविनाश ब्राम्हणकर, अशोक कापगते, नंदू समरीत, मदन रामटेके, बाबू बनकर, सुरेशसिंह बघेल, शालीकराम आसटकर, अंताराम खोटेले, केवळराम लांजेवार, जागेश्वर कापगते, सुधीर गोबाडे, नामदेव टेंभुर्णे सुखदेव इलमकर, अशोक बोरकर, नेतराम गहाणे, वसंता लांजेवार,अनिल खोटेले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)