शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले

By admin | Updated: May 6, 2016 00:52 IST

अड्याळ बसस्थानकावरील प्रवासी निवारा हा जीवघेणा ठरत असल्यामुळे हा निवारा पाडण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये बहुमताने घेण्यात आला.

प्रकरण अड्याळ येथील : प्रवाशी निवारा भुईसपाट, पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नका अड्याळ : अड्याळ बसस्थानकावरील प्रवासी निवारा हा जीवघेणा ठरत असल्यामुळे हा निवारा पाडण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये बहुमताने घेण्यात आला. त्यानंतर आज गुरूवारला हा निवारा पाडण्यात आला. अतिक्रमणाच्या विषयाला धरून ग्रामस्थांनी शांती मोर्चा काढला होता. ‘गाव करी ते राव नाही करी’ या उक्तीचा प्रत्यय अड्याळ येथे गुरूवारला आला.भंडारा - पवनी मार्गावरील अड्याळ येथे अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले होते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून नाहक बळी जात होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकी करून अतिक्रमण मोहीम राबविण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्ये घेतला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाई होणार असल्यामुळे काही अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने आधीच हटविली होती. सध्या उन्हाचे दिवस आहेत यासाठी ग्रामपंचायतीने तात्पुरती प्रवासी निवाऱ्याची सोय व विद्यार्थी पासेसकरीता ग्रामपंचायत कार्यालयात वाहतूक नियंत्रकांना बसण्याची पर्यायी व्यवस्था करावी असे पत्र मंडळाकडून ग्रामपंचायतीला दिले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत उपअभियंता भगत व शाखा अभियंता गभने, बावनकुळे, मानवटकर, तांत्रिक सहायक सुपले, कनिष्ठ अभियंता गजभिये नायब तहसीलदार कांबळे, अड्याळचे ठाणेदार अजाबराव नेवारे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे व चमू उपस्थित होती. अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात सकाळी ११ पासून प्रवासी निवाऱ्यापासून झाली. ग्रा.पं.चाळीतील अतिक्रमण हटणारअतिक्रमणाचा फटका सर्वात दुकानदारांना बसला त्यात ग्रामपंचायती सहा भाडेकरूंनी पाच दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. पाच दिवसात अतिक्रमण काढले नाही तर ते पाच हजार रूपये ग्रामपंचायतीच्या महसुलात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)