शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव आला धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:52 IST

पुनर्वसीत वसाहतीलगत असलेल्या शासकीय जागेवर दोन शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. सतत पाणी साचून राहत असल्याने शहरातील भगतसिंग वॉर्डातील घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांपर्यंत निवेदन दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देभगतसिंग वॉर्डातील प्रकार : मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषद सीओंपर्यंत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुनर्वसीत वसाहतीलगत असलेल्या शासकीय जागेवर दोन शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. सतत पाणी साचून राहत असल्याने शहरातील भगतसिंग वॉर्डातील घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांपर्यंत निवेदन दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही.शहरातील पूरपीडितांचे १९६३ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यांना जागा देवून घरेही बांधण्यात आली. या घराच्या मागच्या बाजूला गावठाणाची शासकीय जागा आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोन शेतकºयांनी या ठिकाणी अतिक्रमण केले आहे. या संपूर्ण जागेचा ताबा घेऊन लोखंडी गेट बसविले आहे. तसेच या नागरिकांच्या घरामागे शासकीय जागेवर ३० फुट खोल खड्डा केला. परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यास त्रास होत आहे.खड्ड्यात सतत पाणी साचत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. महत्वाचे म्हणजे या पाण्यामुळे घराच्या भिंती निकामी होण्याची भीती आहे. या भिंती दलदलीमुळे केव्हाही कोसळू शकतात. याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपरिषदेला निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. या प्रकाराला कंटाळून १८ जून रोजी काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मुख्याधिकाºयांना निर्देश देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावर मुख्याधिकाºयांनी संबंधित दोन शेतकºयांना नोटीस पाठवून यावबाबत खुलासा मागविला. या सर्व प्रकरणात कारवाई झाली नाही. उलट या भागात दलदल निर्माण झाली. या परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते देवीदास मारबते म्हणाले, शासन आणि प्रशासन आमच्या समस्येकडे लक्ष देत नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जाते. याप्रकरणी तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.प्रशासन - शेतकºयांचे संगनमतगत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. या परिसरात सर्व मोलमजुरी करणारी मंडळी राहतात. शेतकरी त्यांना धमकावतात. प्रशासन याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. प्रशासन आणि शेतकºयांचे संगनमत असल्याचा आरोप या भागातील रहिवासी बाबू मेश्राम, शुक्राचार्य डोंगरे, संजय निंबार्ते, रुपचंद मेश्राम, खुशाल आवरकर, बाळकृष्ण बोरकर, विलास ऊके आदींनी केला. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.