शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

महामार्गावरील अतिक्रमण उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:01 IST

राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या फौजफाट्याने ही मोहीम राबविली.

ठळक मुद्देशंभरावर दुकाने हटविली : शहरात अनेकांनी स्वत:च काढले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गासह शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी महामार्गावरील शंभरावर अतिक्रमण उध्वस्त करण्यात आले. तर या मोहिमेचा धसका घेत अनेक व्यवसायीकांनी आपले अतिक्रमणातील दुकान स्वत:च हटविले. महामार्ग प्राधीकरण, बांधकाम विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या फौजफाट्याने ही मोहीम राबविली.भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने याविरूद्ध मोहीम हाती घेतली. दोन दिवसांपासून सायकल-रिक्षावर ध्वनीक्षेपक लावून अतिक्रमण हटविण्यासंदर्भात दवंडी देण्यात आली होती.शुक्रवारी प्रत्येक्ष अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात प्रशासनाचा बुलडोजर पोहचला. नगरपरिषद, बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी याठिकाणी बुलडोजर घेवून हजर झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचे पथकही तैणात करण्यता आले. सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. दुपारपर्यंत मुजबीपर्यंत शंभरावर अतिक्रमण हटविण्यात आले. व्यवसायीकांनी अतिक्रमण हटविताना कोणताही विरोध केला नाही. उलट प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे महामार्गावरील मोहिमेत दिसून आले.राष्ट्रीय महामार्गासोबतच शहरातही नगरपरिषदेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली. शास्त्री चौकात या मोहिमेला प्रारंभ झाला. परंतु व्यवसायीकांनी रात्रीच आपले अतिक्रमण या ठिकाणावरून हटविल्याचे दिसून आले. शहरातील सुमारे ३०० अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून नेल्याचे दिसत होते. तसेच अतिक्रमण हटाव पथक दिसताच अनेकांनी आपले हातगाडे व छोटे दुकाने गुंडाळून नेले. जिल्हा परिषद चौक परिसरात अनेक व्यवसायीकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहे. त्यांनीही आपली दुकाने स्वत:हून काढण्याचे दिसत होते.या मोहिमेत महामार्ग प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, नगरपरिषद सहभागी झाली होती.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाचे ५० कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची ४० जणांचे पथक तैणात करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, तहसीलदार अक्षय पोयाम यांनीही या मोहिमेत भाग घेतला. शहरातील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत होते. आता आणखी दोन दिवस ही मोहीम शहरात सुरू राहणार आहे.तीन दिवस सुरू राहणार मोहीमभंडारा शहरात शुक्रवारी सुरू झालेली ही मोहीम तीन दिवस सुरू राहणार आहे. या दरम्यान अतिक्रमण हटविले जाणार आहे. परंतु अतिक्रमण हटविल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खात्री कुणीही देत नव्हते. रस्ते मोकळे झाले असले तरी ही मोहीम शांत झाले की पुन्हा हे अतिक्रमण वाढणार हे निश्चित.महामार्गावर अतिक्रमण अजामीनपात्र गुन्हाराष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास कारावासही होवू शकतो. परंतु अनेकदा लहान व्यवसायीक असल्याने प्रशासन असे टोकाचे पाऊल उचलत नाही. परिणामी अतिक्रमण वाढत जाते.