शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा सपाटा

By admin | Updated: May 25, 2015 00:41 IST

लाखांदूर तालुक्यात ई वर्ग शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. ग्रामस्थ ....

‘ई’ वर्ग जमीन : महसूल प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन गप्पबारव्हा : लाखांदूर तालुक्यात ई वर्ग शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. ग्रामस्थ बिनदिक्कतपणे अतिक्रमण करीत असताना महसूल प्रशासन व संबंधित ग्रामपंचायत मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. यामुळे गावातील चराई क्षेत्र उद्ध्वस्त होत आहे.लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ई वर्ग गावरान जमीन आहे. शासनाची प्रत्येक गावात ई वर्ग जमीन आहे. ही जमीन विविध प्रयोजनासाठी राखीव ठेवण्यात येते. या जमिनीचा योग्य वापर करून ती सुरक्षित तथा अबाधित रहावी म्हणून अशी जमीन संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहे. ही जमीन कुणीही खासगी उपयोगसाठी वापरू शकत नाही तसे झाल्यास संबंधित व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असते. या जमिनीवर कुणी पिकही घेऊ शकत नाही.गावातील कुणी पीक घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीविरूद्ध मुंबई अधिनियम १९५८ चे कलम ५३ अंतर्गत ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात आहे. तथापि, जवळपास सर्वच ग्रामपंचायत प्रशासनाला या कायद्याचा विसर पडला आहे. या कायद्याचा वापर करून गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई अद्याप कोणत्याच ग्रामपंचायतीने केल्याचे ऐकिवात नाही.या ई वर्ग गायरान जमिनीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीच्या या अनास्थेचा गावातील काही जण लाभ घेत आहेत. गावातील स्थानिक राजकारण कारवाईच्या आड येत असल्याने ग्रामपंचायत त्याकडे कानाडोळा करीत आहे. अनेक गावातील सत्ताधारी मतावर डोळा ठेवून गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास चालढकल करतात. अतिक्रमण काढल्यास आपल्या खुर्चीला धोका पोहचण्याची धास्ती त्यांना भेडसावत असते. बहुतांश ठिकाणी तेथील सरपंच राजकारणामुळे अतिक्रमण धारकांना पडद्यामागून सहकार्य करीत असल्याचेही चित्र दिसून येते. परिणामी तालुक्यात गायरान जमीन गावातीलच नागरिकांकडून गिळंकृत करण्याचे प्रकार वाढत आहे. गावागावातील गायरान जमिनी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जनावरांच्या चराईचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात जनावरे चराईसाठी नेले जातात. मात्र यावर अतिक्रमण होत असल्याने चराईचा क्षेत्रच आता कमी होत आहे. भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)